Times of Maharashtra Desk: या महानगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेसने एकट्याने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे आणि विशेषतः राज ठाकरेंवरील त्यांच्या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. अशातच बुधवार १९ नोव्हेंबर रोजी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बीएमसी निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी युतीच्या रणनीतींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली असावी अशी शक्यता आहे. कॉँग्रेस आणि शरद पवार यांच्यातील ही भेट उद्धव ठाकरेंसाठी काही नवीन आव्हान घेऊन येणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत युती करू नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील..
सध्याची परिस्थिति पाहता कॉँग्रेस आणि शरद पवार यांची ही भेट नेमकी कशासाठी झाली? नेमक कॉँग्रेसच्या मनात काय चालू आहे? शरद पवार देखील ठाकरेंचा हात सोडणार का? असे सर्व प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांची राष्ट्रवादी काही जागांवर कॉँग्रेससोबत युतीत राहील आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत युती करू नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आह असे म्हटले जात आहे.परिणामी, काँग्रेस शरद पवारांना उद्धव ठाकरेंसोबतची युती तोडण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्ननात आहे असे दिसून येत आहे. कॉँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार होती. परंतु या भेटीमुळे काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या निर्णयाशी तडजोड करेल का? असा प्रश्न उभा राहिला आहे.
कॉँग्रेस आणि शरद पवार यांच्यातील भेटीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आता काँग्रेससोबत मिळून महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरवू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्यापही राष्ट्रवादी शरद पवार गटाने या विषयी कोणतेही स्पष्ट भाष्य केलेले नाही. अशा परिस्थितीत शरद पवार ठाकरे बंधूंना सोडून देतील का? हा प्रश्न सर्वाना पडला आहे.



















