पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : गणेश नारंग
Times of Maharashtra Desk: पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देत आणि साधेपणाचा आदर्श जपत हीरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधून अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज सादर केला.
कोणताही गाजावाजा, मिरवणूक किंवा वाहनांचा ताफा न घेता, थेट सायकलवरून निवडणूक कार्यालयात पोहोचत डब्बू आसवानी यांनी राजकारणात सकारात्मक आणि पर्यावरणपूरक पायंडा घातला. त्यांच्या या कृतीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले असून, “असा नेता हवा” अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटताना दिसून आली.
या वेळी श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे, निकिता अर्जुन कदम आणि सौ. प्रियांका कुदळे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र डब्बू आसवानी यांच्या साध्या पण अर्थपूर्ण कृतीने संपूर्ण वातावरणात वेगळाच उत्साह निर्माण झाला.
अर्ज दाखल करताना परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आत्मविश्वास पाहता, मागील कार्यकाळात केलेल्या विकासकामांवर जनतेचा ठाम विश्वास असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, युवकांसाठी उपक्रम आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत केलेल्या ठोस कामांमुळे डब्बू आसवानी यांनी केवळ लोकप्रतिनिधी नव्हे, तर जनतेच्या विश्वासू सहकाऱ्याची ओळख निर्माण केली आहे. अडचणीच्या वेळी तत्पर मदत आणि सतत जनतेमध्ये उपस्थित राहणे हीच त्यांची खरी ओळख ठरली आहे.
फक्त आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून जनतेचा विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून डब्बू आसवानी आज सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळेच यावेळी त्यांचा विजय निश्चित असल्याची भावना नागरिकांच्या उत्साहातून स्पष्टपणे दिसून येत आहे.
साधेपणा, पारदर्शकता आणि विकासाचा ठाम अजेंडा घेऊन पुढे जाणारे हे नेतृत्व पुन्हा एकदा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाले आहे.






















