Homeताज्या बातम्यालोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मानवतेचे आणि क्रांतीचे प्रतीक - रतनलाल सोनग्रा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मानवतेचे आणि क्रांतीचे प्रतीक – रतनलाल सोनग्रा

“क्रांतीपुत्र अण्णा भाऊ साहित्यिकांचा साहित्यिक” या महाचर्चातून उलगडला अण्णा भाऊंचा जीवनप्रवास*

शाहीर नंदेश उमाप, अभिनेत्री, रुक्मिणी सुतार, धर्मेंद्र पाटील अण्णा भाऊ साठे स्मृती पुरस्काराने सन्मानित

पुणे – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मृति दिनाच्या निमित्ताने श्रमिक पत्रकार भवन, येथील सभागृहात झोपडपट्टी सुरक्षा दल व महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल यांच्या वतीने “क्रांतीपुत्र अण्णा भाऊ साहित्यिकांचा साहित्यिक” या विषयावर महाचर्चा करण्यात आली. या प्रसंगी महाचर्चेचे उद्घाटन मा. आमदार लहू कानडे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा होते. या महाचर्चात जेष्ठ विचारवंत सुरेश दाभाडे, बजरंग कोरडे, अशोक घायाळे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट हे होते.

तसेच या कार्यक्रमात अण्णा भाऊंचे स्मरण ठेवून महाराष्ट्राचे लोक कलावंत सिनेपार्श्वगायक शाहीर नंदेश उमाप तसेच “देवमाणूस” या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री, रुक्मिणी सुतार, प्राणी मित्र धर्मेंद्र पाटील, दलित चळवळीतील अभ्यासू विचारवंत प्राचार्य अरुण गाडे, पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अविनाश गोडबोले यांना अण्णा भाऊ साठे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सोनग्रा म्हणाले की समाजात वावरताना माणसांनी माणसासारखे वागावे. जातिवादाच्या चौकटीतून बाहेर पडून समाजाचा आणि स्वतःचा उद्धार करावा. अनिष्ट चालीरितींना मूठमाती द्याला हवी. घराच्या बाहेर पडताना भारतीय म्हणून बाहेर पडा. स्वतःची जात, धर्म प्रत्येकाने स्वतःपुरताच ठेवावा. शासनाचे सर्व कायदे सर्वांना समान आहेत. सर्वांनी त्याचा आदर करावा. स्वतःच्या अस्मितेवर आलेली काजळी दूर करावी. कायद्यामध्ये, माणसांमध्ये मी भेदाभेद करणार नाही असा निर्धार केला पाहिजे. या देशात धर्मनिरपेक्षतेचा टिकली पाहिजे. राजकिय नैतिकता, टिकली पाहिजे त्याशिवाय समाजवादी भारत तयार होणार आहे.

कानडे म्हणाले की मराठी माणसाला या मराठी मातीला तसेच मराठी साहित्यिकांना, मराठी राजकारण्यांनी अण्णा भाऊंचा योग्य तो अभ्यास केलेला आहे ? अण्णाभाऊंची कथांचा महासागर लिहिलेला आहे. अण्णांच्या असंख्य कथा आहेत आणि प्रत्येक कथा १० ते १२ पानाची आहे. अन्नाची कथा कधी फसलेली नाही.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ गायकवाड यांनी केले तर आभार भगवानराव वैराट यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...
error: Content is protected !!