गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ईद-उल-फित्र निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड आणि शिवछत्र परिवाराच्यावतीने आयोजित ईद मिलाप कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदू – मुस्लिम बांधवांनी एकत्र येत या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित हिंदू – मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत स्नेह, बंधुता आणि एकोप्याचा दृढ संकल्प असाच वृद्धिंगत राहावा अशा सदिच्छा व्यक्त करत बीडच्या सामाजिक सलोख्याचे वाहक बनू अशी ग्वाही यावेळी उपस्थित त्यांनी दिली. या ईद-ए-मिलापच्या पहिल्याच कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवछत्र परिवाराने सर्वधर्मसमभाव जपत भाईचारा आणि राष्ट्रीय एकात्मतेची गुंफण केल्याचे दिसून आले.
बीड शहरातील बशीरगंज भागातील अकबर कॅपिटल येथे रविवार दि. 29 मार्च रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवछत्र परिवाराच्या वतीने ईद-ए-मिलाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित हिंदू – मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या.
आ. पंडित म्हणाले की, ईद मिलाप कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व धर्मीयांमधील स्नेह वाढीस लागतो. एकमेकांच्या सण उत्सवातील आनंदाची देवाणघेवाण करत एकमेकांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा या सामाजिक सलोखा वाढवणाऱ्या आहेत. सध्याच्या सामाजिक वातावरणाच्या अनुषंगाने अशा स्नेह जपणाऱ्या आणि बंधुभाव वाढीस लावणाऱ्या कार्यक्रमांची खरी गरज असल्याचे आ. विजयसिंह पंडित यांनी सांगितले. यावेळी सर्व समाज बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी आ. विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, प्रतिनिधी तथा संपादक शेख मुजीबभाई, सभापती शेख निजाम, गटनेते फारुक पटेल, स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, वकील सर, सभापती बाळासाहेब गुंजाळ, सभापती संजय उढान, सभापती जकी सौदागर, सभापती रंजीत बनसोडे, उपसभापती शेख बिलाल, ज्येष्ठ नगरसेवक मोईन मास्टर आदींनी उपस्थित सर्व समाज बांधवांना ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक अशफाक इनामदार, ज्येष्ठ नगरसेवक सादेक अली , खय्युम इनामदार, शेख खलील बब्बु, सय्यद इलियास, वाजेद कुरेशी, मनोज गोडसे, भीमराव वाघचौरे, भैय्यासाहेब मोरे, शेख इकबाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवछत्र परिवारातील सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाम मोहम्मद साकिब यांनी केले. तर आभार शेख मुजीबभाई यांनी मानले.
मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनी घेतला शीरखुर्मा आणि गुलगुल्यांचा आस्वाद
ईद-ए-मिलाप कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, औद्योगिक, पत्र कायदा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी मान्यवरांसह उपस्थित नागरिकांनी
शीरखुर्मा आणि गुलगुल्यांचा आस्वाद घेत सामाजिक सलोख्याच्या गोडवा जपला.






















