Homeमहाराष्ट्रबैल जोडीची चोरी, शेतक-यात भितीचे वातावरण चोरट्याना उरला नाही पोलीसाचा धाक

बैल जोडीची चोरी, शेतक-यात भितीचे वातावरण चोरट्याना उरला नाही पोलीसाचा धाक

गंगाखेड (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागात शेतक-याची , पशु पालकाची जनावरे चोरी होत असल्याच्या घटना वारंवार घडताना दिसुन येतात. पडेगाव येथील शेतकरी शेषेराव आगलावे याच्या शेत आखाड्यावर बांधलेली बैल जोडी दि.१४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी पळवुन नेली.बैल चोरी झाल्याने शेतकरी हतबल झाला असुन शेतीची कामे कशी करावी ही चिंता लागली.पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेला चार दिवस उलटून असुन अद्याप पोलीसाना या चोरीचा उलगडा झाला नाही.

जनावराना सोन्याची किंमत आल्याने चोरट्यानी शेत आखाड्यावर बांधलेल्या जनावराच्या चोरीकडे अधिक लक्ष वेधल्याचे दिसुन येते.अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतक-यात व पशुपालकानी धास्ती घेतल्याचे समोर आले.पडेगाव येथील शेतकरी शेषेराव आगलावे यानी दिवभर शेतात काम केले.सायंकाळी शेत आखाड्यावर रोजच्या प्रमाणे बैल बांधले.त्याना वैरणपाणी करून घरी परतले.गावात लग्न असल्याने त्यानी परत शेत आखाड्यावर गेले नाही.

गावात घरीच मुक्काम केला.दुस-या दिवशी सकाळी शेत आखाड्यावर बांधलेल्या बैलाना चारा पाणी करण्यासाठी गेले असता तिथे बैल आढळून आले नाही.त्यानी परीसरातील शेतक-याकडे चौकशी केली, तसेच सर्व परीसरात शोध घेतला तरी बैल आढळून आली नाही.शोध घेऊन बैल सापडत नसल्याने चोरीला गेल्याची खात्री झाली. पोलीस ठाण्यात धाव घेऊन बैल चोरीची तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.या बैल जोडीची किंमत एक लाख रूपये आहे.दुसरी बैलजोडी विकत घेण्यासाठी पैशे नसल्याने शेतीची कामे कशी करावी याची त्याना चिंता लागली.घटना घडून चार दिवस उलटून गेले तरी पोलीसाना बैलाचा शोध लागला नाही.जनावरे चोरी करणा-या चोरट्यानी तालुक्यात बैल व इतर जनावरे चोरी करण्याचा धडाका लावला.वारंवार जनावरे चोरी होत असल्याच्या घटनेने पशु पालकात धास्तीचे वातावरण निर्माण झाले.पोलीस या चोरट्याचा शोध घेण्यात अयशस्वी ठरत असल्याचे समोर आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...
error: Content is protected !!