Times of Maharashtra Desk,Gautam Gambhir Test Series Loss:दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला पराभव मिळाला. या मालिकेत ०-२ असा पराभव झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या परिषदेत पत्रकरानी तो कसोटी क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षकपदासाठी सर्वोत्तम उमेदवार आहे का? असा प्रश्न गौतम यांना विचारला त्यावर त्याने उत्तर दिले, “बीसीसीआय तो निर्णय घेईल, पण लक्षात ठेवा, मी तोच व्यक्ती आहे ज्याने इंग्लंड, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपमध्ये भारताला दमदार कामगिरी करून दाखवली आहे ” `
नेमक काय म्हणाले गौतम गंभीर
गौतम गंभीर म्हणाले, “ते बीसीसीआयने ठरवायचे आहे. पण मी तोच व्यक्ती आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आशिया कप जिंकला.” “कोणत्याही एका खेळाडूला किंवा कोणत्याही एका फटक्यावर दोष देणे अन्याय्य ठरेल. या पराभवासाठी सर्वजण जबाबदार आहेत, माझ्यापासून सुरुवात. मी कधीही पराभवानंतर कोणत्याही खेळाडूला दोष दिलेला नाही आणि मी कधीही असे करणार नाही.” असे म्हणत त्यांनी या पराभवाची जबाबदारी देखील घेतली आहे.






















