Homeक्राईममहावितरणचा निष्काळजीपणा; पाच लाखांची भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश.

महावितरणचा निष्काळजीपणा; पाच लाखांची भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश.

गेवराई  (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील सहदिवाणी (कनिष्ठ स्तर) न्या. एस. एच. पाटील यांच्या न्यायालयाने नुकसान भरपाईच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक ठरणारा निकाल मंगळवारी दिला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) यांना वादी शेतकरी रामनाथ सर्जेराव माळी,( रा.लुखामसला )यांना रुपये ३ लाख ६० हजार तसेच त्यावर ६ टक्के वार्षिक व्याज अदा करण्याचे आदेश दिले. व्याजासह ही रक्कम अंदाजे पाच लाख रुपयांपर्यंत पोहोचत आहे.
वादी रामनाथ माळी यांच्या मालकीच्या तीन म्हशी या घरासमोर शेतामध्ये बांधलेल्या असताना अचानक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची तार तुटून म्हशींच्या अंगावर पडली. त्यामुळे म्हशींचा मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे म्हशींचा मृत्यू झाल्याचा आरोप करत माळी यांनी २०१९ मध्ये गेवराई न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता.
या प्रकरणात महावितरणकडून योग्य ती खबरदारी न घेतल्याने गंभीर नुकसान झाल्याचा मुद्दा न्यायालयासमोर
मांडण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व कागदपत्रे, पुरावे व साक्षीदारांचे जबाब यांचा सखोल व बारकाईने विचार केला. सुनावणीदरम्यान सादर केलेल्या पुराव्यांवरून प्रतिवादी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांचा  निष्काळजीपणा  झाल्याचे  न्यायालयाच्या स्पष्ट  निदर्शनास आले. परिणामी न्यायालयाने कंपनीला जबाबदार धरून वादीच्या बाजूने निकाल देत नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात वादी शेतकरी रामनाथ सर्जेराव माळी यांच्या वतीने अॅड. स्वप्निल परशुराम येवले यांनी बाजू मांडली. त्यांनी साक्षीदारांची काटेकोर पडताळणी करून तसेच कायदेशीर मुद्द्यांवर ठोस युक्तिवाद सादर करून प्रकरणात यश मिळवले. त्यांना अॅड. सुनील शेजुळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा निकाल केवळ एका शेतकऱ्यापुरता मर्यादित नसून, यामुळे शेतकरी व पशुपालकांना अशा प्रकरणी मदत  मिळविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.  शासकीय किंवा खासगी यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्याचा हा एक महत्त्वाचा निर्णय असल्याचे अॅड. स्वप्निल येवले यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!