Homeमहाराष्ट्रगेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर भागात सध्या वीजेचा मोठा खेळखंडोबा पाहायला मिळत आहे. सतत खंडित होणारी वीज, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा आणि वारंवार लाईट जाण्याच्या प्रकारामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. विशेषतः सध्या उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात नागरिकांचे हाल होत आहेत. या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नवीन घरे उभी राहिली आहेत.

अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र त्यानुसार वीज यंत्रणेमध्ये आवश्यक वाढ करण्यात आलेली नसल्याने संपूर्ण भार तथास्तु मंगल कार्यालयाजवळील विद्युत रोहित्रावर पडत आहे. या रोहित्रावर ओव्हरलोड येत असल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. तरी या परिसराचा विस्तार पाहता याठिकाणी एक नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात यावे, अशी मागणी पत्रकार विनोद नरसाळे यांनी केली आहे.

सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून दुपारपासून रात्री उशिरापर्यंत उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत अचानक लाईट गेल्यानंतर नागरिकांना अक्षरशः घराबाहेर बसण्याची वेळ येत आहे. लहान मुले घामाघूम होत असून वृद्ध नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. सतत खंडित होत असलेल्या वीजपुरवठा यामुळे घरांमध्ये कुलर, पंखे व इतर उपकरणे बंद होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

विशेष म्हणजे वीज आली तरी ती अत्यंत कमी व्होल्टेजने येत असल्यामुळे फ्रिज, टीव्ही, मोटार, इन्व्हर्टर यांसारखी घरगुती उपकरणे व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. कमी दाबामुळे अनेक उपकरणे जळण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी ताकडगाव रोडलगत नवीन विद्युत रोहित्र मंजूर करून तात्काळ बसविण्याची मागणी केली आहे. परिसरातील वाढती घरे, लोकसंख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेता महावितरणने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी पत्रकार विनोद नरसाळे यांनी गेवराई येथील महावितरण कंपनीचे उपअभियंता मोरे यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!