गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने धुमेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत प्रेमळ, मायाळू आणि मनमिळावू स्वभावामुळे त्या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाच्या आणि जिव्हाळ्याच्या होत्या. त्यांच्या साध्या, शांत आणि स्नेहपूर्ण स्वभावामुळे त्यांनी सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत अंतिम दर्शन घेतले. बुधवारी दि. १३ मे रोजी सकाळी १० वाजता धुमेगाव येथील गलधर वस्ती स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार उपस्थित होता. त्यांच्या पश्चात मुले, सुना, मुलगी, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून सुधाकर रामकिसन गलधर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने गलधर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






















