Homeमहाराष्ट्र२७ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; जुन्या आठवणींना उजाळा, गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त

२७ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; जुन्या आठवणींना उजाळा, गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  हरवलेली पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला, ते गेलेले क्षण सजवायला. आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला. या भावनिक शब्दांत तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साष्ट पिंपळगाव (ता. अंबड) येथील सन १९९७-९८ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सोमवारी गेवराई येथील हाँटेल निसर्ग येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.के.सोनवणे सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सखाराम नाटकर पत्रकार विनोद नरसाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. यानंतर के.के.सोनवणे, नाटकर सर, ठेंगल सर, ढवळे सर, एरंडे सर, गवळी, जाधव सर, मोराळे सर, मरपडवाड सर, नरवटे सर, पवार सर या आदर्श ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

आज आम्ही जे काही आहोत ते फक्त शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच, तुम्ही केलेल्या संस्कारामुळे, अशा भावना व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान दीर्घ कालावधीनंतर एकमेकांना भेटताना अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. शाळेतील वर्ग, शिक्षकांची शिस्त, मित्रांसोबत केलेली धमाल, सहली, खेळ आणि अभ्यासातील गमती-जमती यांची आठवण काढताना वातावरण भावनिक झाले होते.

दरम्यान विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पोलिस, डॉक्टर, शिक्षक, शासकीय कर्मचारी, व्यावसायिक व उद्योजक असलेले हे माजी विद्यार्थी पुन्हा एकदा बालमित्रांच्या आठवणीसह सहवासात रमले होते. जुन्या फोटोंना उजाळा, हास्यविनोद, गप्पा आणि आठवणींनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. यावेळी शिक्षकांनी गाव व विद्यार्थ्यांनी दिलेला आदरयुक्त सहवासाबद्दल तर अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्वांनी पुढील काळातही एकमेकांशी संपर्क कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले, तर आभार ज्ञानदेव चोरमारे, यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक किरण औटे, विवेक माने, गजानन शिंदे, नंदकिशोर कामे, ज्ञानेश्वर बोचरे, विश्वनाथ गायकवाड, मैना चिंतामणी, मनिषा दाभाडकर, सविता ढोले, अयोध्या झिंझुर्डे, सुलोचना गायकवाड यांनी परिश्रम घेतले. हा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्याला जवळपास ७० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!