Times of Maharashtra Desk: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी, 12वी चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. याचे संभाव्य वेळापत्रक 13 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले होते. मंडळाने सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये कोणताही बदल न करता 10 फेब्रुवारी ते 12 मार्च या दरम्यान 12 वीच्या परीक्षा होणार तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान 10 वीच्या परीक्षा पार पडणार आहेत.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळतो. पण यावर्षी दोन महिने उशीरा म्हणजेच १३ ऑक्टोबरला दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये कोणताही बदल न करता राज्य मंडळाने ३१ ऑक्टोबरला अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसन्या आठवडयात आणि दहावीच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात. संबंधित परीक्षांचा ऑनलाइन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येणार आहे.






















