Homeताज्या बातम्यापिंपरी चिंचवड : कुदळवाडी चिखलीतील अतिक्रमण कारवाई संदर्भात थेट राष्ट्रपतींकडे मागितली दाद!

पिंपरी चिंचवड : कुदळवाडी चिखलीतील अतिक्रमण कारवाई संदर्भात थेट राष्ट्रपतींकडे मागितली दाद!

पिंपरी चिंचवड : कुदळवाडी, चिखली भागामध्ये गेल्या 30 वर्षापासून व्यापारी व्यवसाय करत आहेत. यासाठी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच विविध स्थानिक आस्थापनांचे परवाने घेतलेले असताना अमानुष पद्धतीने कारवाई करण्यात आली.व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्यानंतर पुरेसा कालावधी देण्यात आला नाही.

त्यामुळे शेड, कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कच्चा माल यांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. व्यापाऱ्यांचे कधीही भरून न येणारे मोठे नुकसान पिंपरी चिंचवड महापालिकेने केले असून अद्यापही कारवाई सुरूच आहे. या कारवाई संदर्भात हस्तक्षेप करण्यात यावा. तात्पुरती ही कारवाई थांबवावी, उद्योजकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उद्योजक डॉ. लालबाबू गुप्ता यांनी देशाचे राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच गुप्ता यांनी काही मागण्या देखील राष्ट्रपतीकडे पत्राद्वारे केल्या आहेत.

विश्व श्री राम सेना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उद्योजक डॉ. लालबाबू गुप्ता यांनी देशाचे राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे कुदळवाडी भागामध्ये झालेल्याअतिक्रमण कारवाईची तसेच व्यापाऱ्यांवर झालेल्या अन्यायाची माहिती दिली आहे.

राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रामध्ये लालबाबू गुप्ता यांनी म्हटले आहे, कुदळवाडी चिखली येथे गेल्या तीसहून अधिक वर्षांपासून विविध व्यापारी आपला व्यवसाय करत आहेत. या व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक एनओसी मिळवले आहेत आणि ते सर्व कर देखील भरतात.

अलिकडेच पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाने या परिसरातील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली.या कारवाईत गोदामे आणि मालमत्ता उद्ध्वस्त झाली आणि व्यापाऱ्यांचा संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाला असल्याचे देखील गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यामुळे तूर्तास ही कारवाई थांबून आपण या प्रकरणात हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांचे हित जपावी अशी मागणी लालबाबू गुप्ता यांनी केली आहे.

राष्ट्रपतींकडे केलेल्या मागण्या

औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांना जमीन देण्यात यावी.जे व्यापारी कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावत आहेत त्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई देण्यात यावी. व्यापाऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पुनर्वसन योजना राबवावी. व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने योग्य पावले उचलली जावेत यातून सामाजिक परिणाम रोखले जातील. कुदळवाडी चिखली परिसरात कारवाईमुळे उध्वस्त झालेल्या व्यापाऱ्यांना शेजारील एमआयडीसीमध्ये जागा आरक्षित करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...

रावराजूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३५ सूर्यनमस्कारांनी अभिवादन

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : पालम तालुक्यातील रावराजूर येथे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (दि. १४ एप्रिल) विविध कार्यक्रमांचे उत्साहात...

Bopodi: बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती…

0
Times Of Maharashtra Desk, Pune: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक...

NCMC कार्ड नसले तरी सवलती कायम! अफवांवर विश्वास ठेवू नका – वाहतूक निरीक्षक दीपक...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : येथील बसस्थानकात सध्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) काढण्याची प्रक्रिया सुरू असताना, प्रवाशांमध्ये विविध अफवा पसरत असल्याचे दिसून येत...

जय भवानी सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात साजरी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजीनगर तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कारखान्याच्या कार्यालयात कार्यस्थळावर ‘डॉ....

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय...
error: Content is protected !!