Homeमहाराष्ट्र८७९ दिवसांनंतर प्रशासकीय राजवटीचा शेवट; जळगाव मनपात लोकप्रतिनिधींचे शासन सुरू

८७९ दिवसांनंतर प्रशासकीय राजवटीचा शेवट; जळगाव मनपात लोकप्रतिनिधींचे शासन सुरू

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) :  महानगरपालिकेत तब्बल ८७९ दिवसांनंतर आज प्रशासकीय राजवटीचा अधिकृत शेवट होत असून पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचे शासन सुरू होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया आज पूर्ण होत असून शहराच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. दीर्घकाळ प्रशासकांकडे असलेला कारभार आता निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांकडे जाणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता व अपेक्षा वाढल्या आहेत.

महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ मनपाचा कारभार प्रशासकीय यंत्रणेकडे होता. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून आज महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया पार पडत आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

दुपारी १२ वाजेपर्यंत बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होणार असून त्यानंतर नव्या महापौर व उपमहापौरांकडे कार्यभार सोपवण्यात येणार आहे. यानिमित्ताने जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात भाजपचा तिसरा महापौर विराजमान होणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भाजपकडे सत्ता आली होती. त्या काळात सीमाभोळे आणि भारती सोनवणे यांना महापौरपदाची संधी मिळाली होती. मात्र त्यानंतर सत्ता गेल्याने भाजपला अडीच वर्षे विरोधात बसावे लागले होते. आता पुन्हा बहुमत मिळाल्याने भाजपकडे महापौरपद तिसऱ्यांदा येत आहे.

निवड प्रक्रियेसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ही बैठक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीस आयुक्त, नगरसचिव तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या प्रारंभी अर्जांची छाननी केली जाईल, त्यानंतर नियमांनुसार उमेदवारांना माघारीसाठी वेळ देण्यात येईल. माघारीची मुदत संपल्यानंतर जिल्हाधिकारी अधिकृतरीत्या बिनविरोध निवडीची घोषणा करतील.

दरम्यान, प्रशासनाने नव्या महापौर व उपमहापौरांसाठी महापालिकेच्या सतराव्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था निश्चित केली आहे.येथूनच शहरातील विकासकामांवर थेट लक्ष ठेवत निर्णय घेतले जाणार आहेत. सभागृहाच्या बैठक व्यवस्थेतही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून नव्या नेतृत्वाच्या स्वागतासाठी मनपा सज्ज झाली आहे. आमदार सुरेश भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत आज नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.

तब्बल अडीच वर्षांनंतर जळगाव महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचे शासन सुरू होत असल्याने शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. जळगाव मनपेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार असून शहराच्या प्रशासनात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...
error: Content is protected !!