Times of Maharashtra Desk : कोंढवा-कौसरबाग परिसरातील प्रभाग क्रमांक १९ ‘क’ मध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काशीफ सय्यद यांच्याबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, स्थानिक पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेतली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, काशीफ सय्यद हे अडचणीच्या काळात नागरिकांच्या संपर्कात राहणारे आणि प्रत्यक्ष सहभाग घेणारे व्यक्तिमत्त्व आहे.एका नागरिकाने सांगितले,“काशीफ सय्यद अनेक वर्षांपासून इथे समाजकारण करत आहेत. समस्या असल्या की ते थेट लोकांशी संवाद साधतात.” युवक वर्गातही त्यांच्या विचारसरणीबाबत उत्सुकता दिसून येत आहे.एका युवकाने प्रतिक्रिया देताना म्हटले, “युवकांचे प्रश्न समजून घेणारे, सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आज गरजेचे आहे.” तर एका ज्येष्ठ नागरिकाने मत व्यक्त करताना सांगितले, “कोंढवा परिसर विविध समाजघटकांनी बनलेला आहे. अशा ठिकाणी समन्वय साधणारी आणि सर्वांना विश्वासात घेणारी भूमिका महत्त्वाची ठरते.”

सेक्युलर दृष्टिकोन, स्थानिक प्रश्नांवरील सक्रिय सहभाग आणि दीर्घ सामाजिक बांधिलकी यामुळे काशीफ सय्यद हे सध्या प्रभागात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १९ ‘क’ मध्ये राजकीय वातावरण तापत असताना, नागरिकांमध्ये विविध मतप्रवाह ऐकायला मिळत असून काशीफ सय्यद यांचे नाव वारंवार चर्चेत येत आहे.






















