Homeताज्या बातम्याKumbh Mela Tapovan Sadhugram tree cuttingतपोवनातल्या वृक्षतोडीवर राज्यभरातून संताप; सयाजी शिंदेंचा सरकारला...

Kumbh Mela Tapovan Sadhugram tree cuttingतपोवनातल्या वृक्षतोडीवर राज्यभरातून संताप; सयाजी शिंदेंचा सरकारला थेट सवाल

Times of Maharashtra Desk: येत्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्राम साठी सुरू असलेल्या वृक्षतोडीला मोठा विरोध सुरू आहे. साधू-महंतांसाठी 1,150 एकरांवर भव्य साधुग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात येत असून त्यासाठी जवळपास 1,800 झाडांची कत्तल केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पक्ष आणि कलाविश्वातील अनेक कलाकार आक्रमक झाले आहेत.अभिनेता सयाजी शिंदे यांनीही या वृक्षतोडीविरोधात कडाडून भूमिका मांडत सवाल केला आहे “ज्यांच्यासाठी झाडं तोडत आहात, त्या साधू-संतांना तरी ही झाडतोड पटेल का?”

6 डिसेंबरला मोठा आंदोलन कार्यक्रम
तपोवनातील झाडतोडीच्या मुद्द्यावर अनेक नेते व कलाकार सोशल मीडियावरून आवाज उठवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्मचारी यांनीही झाडतोडीविरोधात निषेध जाहीर केला आहे. या निषेधार्थ शनिवार, 6 डिसेंबर रोजी संभाजीनगर रोडवरील कमानीजवळ हा निषेध करण्यात येणार असून सर्व कलाकार आणि नाशिककरांना सहभागी होण्याचे मनसेकडून आवाहन करण्यात आले आहे.

“दहा वर्षांची झाडं तोडून नवीन झाडं लावण्याची कल्पना चुकीची” — सयाजी शिंदे

पत्रकार परिषदेत बोलताना सयाजी शिंदेंनी शासनाच्या पूरक वृक्षलागवड धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले “दहा वर्षे वाढलेली झाडं तोडून त्यांच्या बदल्यात नवी झाडं लावायची? म्हणजे पोरांना मारायचं आणि आई-बापाला जिवंत ठेवायचं! झाडं ही आपली आई-वडील आहेत. आपण जगतो ते झाडांमुळे. त्यांच्यावर हल्ला होत असताना आपण गप्प कसे बसायचं?”

साधूंना झाडं तोडणं मान्यच नाही” — शिंदे
“आम्ही साधू-संतांचा अपमान करत नाही. पण झाडं तोडणं त्यांना पटेल का? ऋषी-मुनी झाडांच्या सावलीत तपश्चर्या करत होते,” असे ते म्हणाले.मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, “मला त्यावर उत्तर द्यायचं नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.यावर निष्कर्ष देताना त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले की
“झाडं लावण्यापेक्षा झाडं जगली पाहिजेत हे महत्त्वाचं. वृक्षतोड ही मुळात चुकीची गोष्ट आहे.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!