Homeआरोग्यलोणेरे हत्याकांडाला वेग: आरोपी न्यायालयीन कोठडीत, कठोर कलमांखाली खटला तीव्र

लोणेरे हत्याकांडाला वेग: आरोपी न्यायालयीन कोठडीत, कठोर कलमांखाली खटला तीव्र

लोणेरे-अलिबाग (प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) :
रायगड जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला न्यायालयाने पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत पाठवले असून, त्याच्यावर गंभीर आणि कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९ एप्रिल रोजी घडलेल्या या भीषण घटनेचा उलगडा २० एप्रिलला झाला होता. तपासात तरुणीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला २६ एप्रिल रोजी ठाणे परिसरातून अटक केली होती. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 66/2026 नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 64 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(2)(V) आणि 3(1)(w)(i)(ii) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कठोर तरतुदींमुळे आरोपीला कडक शिक्षा होण्याची शक्यता बळावली आहे.

घटनेनंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय पक्षांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, अलिबाग येथे पार पडलेल्या जिल्हा विकास समन्वय समितीच्या बैठकीतही या प्रकरणाचा मुद्दा चर्चेत राहिला. प्रतिनिधी रविंद्र मोरे यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अनुभवी सरकारी वकील अँड. प्रसाद शांताराम पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. तसेच कुटुंबाला आर्थिक मदत, घरकुल आणि शासकीय नोकरी देण्याचीही मागणी पुढे आली.

तपासात काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. गुन्ह्याची अचूक पार्श्वभूमी, संभाव्य सहआरोपी, वापरलेले हत्यार आणि लॉजमध्ये सीसीटीव्ही नसणे या बाबी गंभीर ठरत आहेत.

हे प्रकरण आता केवळ एक गुन्हा न राहता समाजाच्या सुरक्षिततेचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा मुद्दा बनले आहे. आरोपी अटकेत असला तरी अंतिम न्याय मिळेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या खटल्यावर खिळून राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!