Homeक्राईमलोणेरे हत्याकांड प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची मागणी; रामदास आठवले यांच्याकडे निवेदन

लोणेरे हत्याकांड प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची मागणी; रामदास आठवले यांच्याकडे निवेदन

माणगांव( प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे घडलेल्या कु. पल्लवी प्रविण मोरे हत्याकांड प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडी कोकण प्रदेशाचे कार्याध्यक्ष अमित कांबळे यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले. या निवेदनात अलिबाग जिल्हा व सत्र न्यायालयातील अनुभवी वकील अॅड. प्रसाद पाटील तसेच महाड येथील अॅड. संजय भिसे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कु. पल्लवी मोरे ही अनुसूचित जाती प्रवर्गातील अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी होती. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि न्यायालयीन लढा प्रभावीपणे लढता यावा यासाठी अनुभवी सरकारी वकिलांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अड. प्रसाद पाटील यांनी अनेक गाजलेल्या फौजदारी खटल्यांमध्ये काम केले असून जिल्हा सरकारी वकील म्हणूनही त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच अॅड. संजय भिसे यांनाही फौजदारी प्रकरणांचा दीर्घ अनुभव असल्याने या दोघांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय पल्लवी मोरे ही कुटुंबातील कमावती सदस्य असल्याने तिच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या हत्याकांडामुळे रायगड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!