Times of Maharashtra Desk, BMC elections: मुंबईच्या बीएमसी निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजीमुळे काँग्रेसने निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले.तरीही आता उद्धव ठाकरे काँग्रेसला परत आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असली, तरी ठाकरे दिल्लीतील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांशी बोलत आहेत.उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे की, जर विरोधकांवर लढताना आघाडी तुटली आणि प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढला, तर दोन्ही पक्षांचे नुकसान होईल.
खर तर काँग्रेसने उद्धव ठाकरेंना आधीच सांगितले होते की, जर राज ठाकरे तुमच्यासोबत आले, तर आम्ही (काँग्रेस) महाविकास आघाडीत राहणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कॉँग्रेस नाराज असून आघाडीतून बाहेर जाऊन निवडणूक लढवणार आहे. तरीही, उद्धव ठाकरे महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहेत आणि काँग्रेसला सोबत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सर्व पक्षांचे एकत्र राहणे खूप गरजेचे आहे, नाहीतर दोघांचेही नुकसान होईल.- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या मते , जर दोन्ही पक्ष वेगळे लढले तर दोघांचेही नुकसान होईल.महायुतीला हरवायचे असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र राहणे खूप गरजेचे आहे असे म्हणत ते कॉँग्रेसला मनवण्याच्या प्रयत्नांत आहेत.
मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही. – मनसे नेते संदीप देशपांडे
तर दुसरी कडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाविकास आघाडी (MVA) मध्ये सामील झाल्यामुळे अशी शक्यता निर्माण झाली आहे की राज ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी महानगरपालिका काबीज करू शकते. परंतु मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की शरद पवार महाविकास आघाडीत आहेत, परंतु मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही. त्यामुळे महावीकस आघाडीत नक्की चले तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.






















