Times of Maharashtra Desk:महाराष्ट्रातील राजभवनचे नाव आता ‘लोकभवन’ असे बदलण्यात आले आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की राज्यपालांच्या आदेशानुसार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून राजभवनचे नाव बदलण्यात आले असून, यापुढे हे ‘लोकभवन’ म्हणून ओळखले जाईल.राज्यपाल येथे वास्तव्य करतात आणि नवीन नावामुळे प्रशासनिक कार्यालयांचे उद्दीष्ट लोकाभिमुख सेवा आणि जबाबदारी दर्शविणे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘सेवा तीर्थ’ असे बदलण्यात आले होते.हा नवीन पीएमओ कॉम्प्लेक्स सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आले असून, येथे पीएमओ व्यतिरिक्त कॅबिनेट सचिवालय, नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सचिवालय आणि ‘इंडिया हाऊस’ यासारखी महत्त्वाची कार्यालये असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रशासनात शासकीय इमारतींच्या नावांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. 2016 मध्ये त्यांचे निवासस्थान ‘7 रेस कोर्स रोड’ वरून ‘7 लोक कल्याण मार्ग’ बनवले गेले. 2022 मध्ये राजपथचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्यात आले. आता प्रशासनिक केंद्रामध्येही ‘सेंट्रल सेक्रेटेरिएट’च्या जागी ‘कर्तव्य भवन’ अस्तित्वात आले आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, हे बदल फक्त नावांचे नव्हे तर शासनाच्या विचारसरणीत होणाऱ्या परिवर्तनाचे प्रतीक आहेत. सत्ता आणि नियंत्रणाच्या जुन्या चिन्हांऐवजी ‘सेवा’, ‘कर्तव्य’ आणि ‘जवाबदारी’ यांना केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे असे देखील अधिकाऱ्यानी सांगितले आहे.






















