Times of Maharashtra desk : राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांची तयारी सुरू आहे. त्यामुळे सध्या राजकीय हालचालीना वेग मिळाला असून पक्षांमध्ये चांगलेच आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. फलटण महिला डॉक्टर प्रकरण असो वा शेतकरी कर्ज माफी मोर्चा सध्या नेत्यानेत्या मध्ये आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत अशातच मतदान यादीतील गैरप्रकार आणि मतचोरी विरुद्ध महावीकस आघाडी निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढणार असल्याची महिती समोर आली आहे. हा मोर्चा १ नोव्हेंबरला असून या मोर्चात पुनः एकदा राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत. यावर संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले संजय शिरसाठ?
मतदान यादी नीट असावी असे आम्हाला सुद्धा वाटते आणि ते झालेच पाहिजे पण शिवसेना प्रमुखांच्या आजूबाजूला बडवे बसलेले आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना घेऊन ठेवलेलं आहे, म्हणून मी शिवसेना सोडली असं वाक्य राज ठाकरे यांचं होत, मग आज तुम्ही पुन्हा त्यांच्याकडेच जात आहात, तुम्ही त्यांच्याकडे गेले त्याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची अवस्था काय आहे? कोणता झेंडा घेऊ हाती? ठाकरे गटाचा? राहुल गांधी यांच्या पक्षाचा की शरद पवारांच्या पक्षाचा? आता तुमच्या स्वतःच्या पक्षाचा झेंडा कधी कोणाच्या हातात जाईल सांगता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं टाळा’, असं संजय शिरसाठ यांनी राज ठाकरेना प्रत्युत्तर दिले आहे.






















