Times of Maharashtra desk, Bacchu Kadu Police Case : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवा आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे आशा अनेक मागण्यांसाठी सोमवार २७ ऑक्टोबर पासून अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकाऱ्यांचा विराट मोर्चा सुरू होता. यावर सरकार 30 जून पर्यंत निर्णय घेईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे यामुळे बच्चू कडूंच्या आंदोलना थोड्या प्रमाण यश मिळाले आहे असे म्हणता येईल पण आंदोलन मागे घेताच बच्चू कडूंवर कारवाई करण्यात आली आहे. आंदोलना दरम्यान नागरिकांना झालेल्या त्रासामुळे बच्चू कडूसह आंदोलकांवर नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका गुन्हा काय ? आणि कोणा कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला ?
बेकायदेशीरपणे महामार्ग अडविले, नागरिकांची गैरसोय झाली यासाठी नागपूर पोलिसांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी आंदोलकांना
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्चजवळील मोकळ्या जागेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी त्याच्या दोन किमी अलीकडेच वर्धा मार्ग अडविला आणि जवळपास 30 तासांहून अधिक वेळ संपूर्ण महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानंतर आंदोलक तेथून हटल्यानंतर हिंगणा पोलिसांनी अटींचे उल्लंघन करणे, बेकायदेशीरपणे जमून नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे आणि वाहतुकीत अडथळा आणणे यासारख्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
बच्चू कडूंच्या महालाची कसून चौकशी करा…
भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत बच्चू कडूंच्या महालाची कसून चौकशी करा अशी मागणी केली आहे. गरिबांच्या जमिनी लुटून त्यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. यावर अद्यापही बच्चू कडू यांनी काही उत्तर दिले नसून बच्चू कडू यावर काय भाष्य करणार याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे .






















