Homeताज्या बातम्याMumbai Municipa, Election : “शेवटच्या क्षणी युती, शेवटच्या क्षणी उमेदवार: ठाकरे बंधूंची...

Mumbai Municipa, Election : “शेवटच्या क्षणी युती, शेवटच्या क्षणी उमेदवार: ठाकरे बंधूंची काटेकोर रणनीती”

Times of Maharashtra Desk : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यंदाची महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची, असा निर्धार भाजपने केला असून त्यासाठी आक्रमक रणनिती अवलंबली जात आहे.भाजपकडून मनसे आणि ठाकरे गटातील नाराज नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हा धोका ओळखून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संभाव्य फोडाफोड रोखण्यासाठी एक खास आणि काटेकोर रणनीती आखली आहे.

युतीची घोषणा अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी
मुंबई महापालिकेसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मनसे आणि ठाकरे गटाची युती झाल्यास, प्रत्येक प्रभागात एकाच उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांकडून बंडखोरी किंवा भाजपमध्ये प्रवेशाचा धोका वाढू शकतो. हा धोका टाळण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी आदल्या दिवशी युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. 22 किंवा 23 डिसेंबर रोजी मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन करून ठाकरे बंधू संयुक्तपणे युतीची घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाराज नेत्यांना दुसऱ्या पक्षाशी वाटाघाटी करण्यासाठी फारसा वेळ मिळणार नाही आणि संभाव्य बंडखोरीवर नियंत्रण राहील, असा अंदाज आहे.

उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणी जाहीर होणार
युतीनंतर जागावाटप निश्चित झाल्यावर उमेदवारांची नावे लगेच जाहीर केली जाणार नाहीत. अंतिम उमेदवारांना पक्षाकडून थेट फोन करून कळवण्यात येईल आणि त्यानंतर अधिकृत एबी फॉर्म दिला जाईल. उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणी जाहीर केल्यास बंडखोरांना उमेदवारी अर्ज भरणे किंवा दुसऱ्या पक्षात जाणे कठीण होईल, ही या रणनीतीमागची भूमिका आहे.

जागावाटप जवळपास निश्चित
मनसे-ठाकरे गटाच्या युती आणि जागावाटपाबाबत ‘शिवतीर्था’वर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशीही संवाद साधला आहे. राज ठाकरे आज मनसेच्या प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार असून, गुरुवारी ठाकरे बंधू युतीची औपचारिक घोषणा करतील, अशी माहिती मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

दोन्ही पक्षांतील जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात असून, उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितपणे याबाबतची घोषणा करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या वाढत्या ताकदीसमोर ठाकरे बंधूंची ही संयुक्त खेळी कितपत यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!