Homeमहाराष्ट्रमंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने या प्रकरणाची चर्चा राज्यभर रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात कार्यरत असलेल्या राजेंद्र ढेरंग या कर्मचाऱ्याने एका मेडिकल दुकानदाराकडून ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून त्याला अटक केली. या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंत्र्यांचा स्पष्टीकरणाचा दावा

घटनेनंतर मंत्री झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणात माझा संबंध आढळल्यास मी राजीनामा देईन, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, चौकशीत त्यांच्या खासगी सहाय्यकाने संबंधित कर्मचाऱ्यास पैसे स्वीकारण्यास सांगितल्याची माहिती पुढे आल्याची चर्चा आहे. त्यामुळे चौकशीचे धागेदोरे पुढे कोणत्या दिशेने जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नियोजित कार्यक्रम रद्द

या प्रकरणानंतर मंत्री झिरवळ यांनी आपले नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय आदिवासी साहित्य-संस्कृती संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे आयोजकांना निराशा झाली.

मुख्यमंत्र्यांची भेट शक्य

सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्री झिरवळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देऊ शकतात. सध्या ते नाशिकमध्ये असल्याची माहिती असून दिल्ली दौऱ्याचा कोणताही कार्यक्रम नसल्याचेही समजते.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रालयातील या कारवाईमुळे प्रशासनातील पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘उत्कर्ष VIII’ राष्ट्रीय परिषद 11 व 12 मार्च...

0
Times O Maharashtra Desk : पुणे : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट, लोहेगाव, पुणे येथे 11 व 12 मार्च 2026 रोजी दोन दिवसीय...

महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाची गेवराई तालुका कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी अशोक मोताळे बिनविरोध

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेवराई तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, गेवराई येथील...

हडपसर उड्डाण पुलाच्या येथे अपुरा प्रकाश धीरज महांगरे यांची येलो ब्लिंकिंग लाईटची मागणी

0
  धीरज महांगरे ( पुणे प्रतिनिधी ) : हडपसर गाव ते गाडीतळ यांना जोडणाऱ्या भोसले गार्डन येथील उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या ठिकाणी अपुरा प्रकाश आणि योग्य इशारा...

भटके विमुक्त समाजाच्या मागण्यांसाठी व नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज बैठक

0
विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : भुसावळ तालुक्यातील भटके विमुक्त समाजातील विविध अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी...

झाडूचा राजा अन् बाबांचे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा” : डॉ. धनराज खानोरकर

0
रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : संत हे अनंत असतात. जगातील आघात सोसत समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करणाऱ्यांनाच खरे संत म्हणतात. अशा संतांमध्ये...

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘उत्कर्ष VIII’ राष्ट्रीय परिषद 11 व 12 मार्च...

0
Times O Maharashtra Desk : पुणे : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट, लोहेगाव, पुणे येथे 11 व 12 मार्च 2026 रोजी दोन दिवसीय...

महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाची गेवराई तालुका कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी अशोक मोताळे बिनविरोध

0
विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेवराई तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, गेवराई येथील...

हडपसर उड्डाण पुलाच्या येथे अपुरा प्रकाश धीरज महांगरे यांची येलो ब्लिंकिंग लाईटची मागणी

0
  धीरज महांगरे ( पुणे प्रतिनिधी ) : हडपसर गाव ते गाडीतळ यांना जोडणाऱ्या भोसले गार्डन येथील उड्डाणपुलाच्या सुरुवातीच्या ठिकाणी अपुरा प्रकाश आणि योग्य इशारा...

भटके विमुक्त समाजाच्या मागण्यांसाठी व नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज बैठक

0
विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : भुसावळ तालुक्यातील भटके विमुक्त समाजातील विविध अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी...

झाडूचा राजा अन् बाबांचे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा” : डॉ. धनराज खानोरकर

0
रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : संत हे अनंत असतात. जगातील आघात सोसत समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करणाऱ्यांनाच खरे संत म्हणतात. अशा संतांमध्ये...
error: Content is protected !!