Times of maharashtra Desk, Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३८ (अ) – बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव परिसरात निवडणुकीची लढत चांगलीच रंगली आहे. या प्रभागात मतदारांसमोर दोन वेगवेगळ्या विचारधारा आणि कार्यशैलींचा थेट सामना पाहायला मिळत आहे.
एकीकडे माजी नगरसेविका स्मिता कोंढे असून, त्यांच्या कार्यकाळात अनेक मूलभूत नागरी प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांबाबत अपेक्षित कामे झाली नसल्याची नाराजी मतदारांमध्ये दिसून येत आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीच्या उमेदवार सौ. अस्मिता भूषण रानभरे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. सामान्य कुटुंबातून आलेल्या अस्मिता रानभरे या संविधानिक मूल्ये, पारदर्शक कारभार आणि विकासवादी विचारधारेच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन करत असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक विकास, महिला सशक्तीकरण, युवकांसाठी संधी, तसेच मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर त्यांचा भर असल्याचे त्यांच्या प्रचारातून दिसून येत असल्याचीही चर्चा आहे. ‘सेवेसाठी राजकारण’ ही भूमिका घेत त्या मतदारांशी संवाद साधत आहेत.
या प्रभागातील लढत केवळ उमेदवारांची नसून जुना विश्वासघात विरुद्ध नवी ऊर्जा आणि अपेक्षाभंग विरुद्ध विश्वासाचा नवा संकल्प अशीच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मागील काही दिवसांपासून बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण, तरुणांमधील नशेखोरी वाढल्याने या प्रभागातील नागरिक येत्या निवडणुकीत सुशिक्षित अस्मिता भूषण रानभरेंच्या बाजूने कौल देतात का? याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलं आहे.






















