Homeताज्या बातम्याभाडेवाढ मुळे पुणेकर आक्रमक ; "भाडेवाढीच्या बसमध्ये पायच ठेवायला भीती वाटते!" —...

भाडेवाढ मुळे पुणेकर आक्रमक ; “भाडेवाढीच्या बसमध्ये पायच ठेवायला भीती वाटते!” — पायल राऊत यांची मार्मिक टीका…

भाडेवाढ मुळे पुणेकर आक्रमक; “भाडेवाढीच्या बसमध्ये पायच ठेवायला भीती वाटते!” – पायल राऊत यांची मार्मिक टीका…
महिला आयुक्तांनी महिलांच्या समस्या समजण्याची गरज…
Speacial Report By Times Of Maharashtra

 

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) १ जूनपासून अचानक केलेली भाडेवाढ ही प्रवाशांच्या खिशावर दरोडा आहे की, विकासाच्या नावाखाली चाललेली क्रूर चेष्टा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप प्रवाशांच्या डोळ्यांतील पाण्यातच दडलं आहे. गेल्या काही वर्षात एकदाही दर न वाढवलेली PMPML अचानक दर दुप्पट करून काय साध्य करू पाहतेय?

किमान ५ किलोमीटरच्या प्रवासासाठी आधी ५ रुपयांत पूर्ण होणारी यात्रा, आता १० रुपयांमध्येही अर्धवट वाटतेय. पुणे-पिंपरी दरम्यानचा दररोजचा पास ४० रुपयांवरून ७० रुपयांवर गेला आणि PMRDA हद्दीत मासिक पास १५०० रुपये करून प्रवाशांच्या धैर्याची परीक्षा घेतली जातेय. हे सगळं एका रात्रीत झालंय – न विचारपूस, न चर्चा काहीच नाही! हे नेमकं कोणासाठी झालंय हा मोठा प्रश्न सध्या उद्भवला आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the below Image👇👇
👆👆Click the above Image 👆👆
Advertisement by Unique Computers 

“आमच्या मुली आधीच कमी पगारात काम करत आहेत. महिन्याच्या शेवटी आम्ही कशीबशी घर चालवत होतो. आता हे भाडेवाढीचं संकट म्हणजे आमच्या खिशावर आघातच नाही, तर रोजच्या जगण्यावर घाव आहे,” असं मार्मिक शब्दांत प्रवासी पायल राऊत म्हणाल्या. त्यांच्या भावना एकट्याच्याच नाहीत – तर लाखो सामान्य प्रवाशांच्या आहेत.

दरवाढीच्या पहिल्याच दिवशी PMPML ने ५५ लाख रुपयांचे ‘अतिरिक्त’ उत्पन्न मिळवलं हे खरं, पण हे उत्पन्न नक्की कोणाच्या कष्टातून आणि वेदनांतून मिळालं हे पाहणं महत्त्वाचं आहे. रविवारी एकूण १.९७ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला – पण त्यामागे ९.४५ लाख प्रवाशांचा संताप दडलेला आहे. हे ही बाब विचारात घेण्यासारखी आहे.

त्यामध्ये पुण्यातील PMPML च्या आयुक्त दीपा मुधोल मुंडे हे आहेत. यांना मुलींचा आणि महिलांचा विचार कसा आला नाही. असा देखील काहींमध्ये चर्चा रंगली आहे.

प्रवाशांचा मुद्दा साधा आहे – भाडे वाढवायचं असेल, तर टप्प्याटप्प्याने वाढवा. एका रात्रीत दाम दुप्पट करून सामान्य माणसाच्या जगण्याचा प्रश्न का उभा करता? हळूहळू, वर्षा-दोन वर्षांनी ५-५ रुपयांनी वाढवली असती, तर लोक सहनही केले असते. पण हे निर्णय पुण्याच्या वातानुकूलित कॅबिनेटमध्ये बसून घेतले जातात, ज्यांना रांगेत उभं राहून १० रुपये सुटे देतानाचं आयुष्य कळतच नाही.

PMPML च्या या धोरणामुळे महिला, विद्यार्थी, वृद्ध, कामगार – सगळ्यांच्या जीवनशैलीत गडबड झाली आहे. “दुप्पट भाडे भरून आम्ही अर्धा प्रवासच करू का?” अशी चिडचिड प्रत्येक बसमध्ये ऐकू येतेय.

आज पुणे शहरात काही सोशल मीडियावर #PMPML\_भाडेवाढविरोधात, #माझीबस\_माझा\_हक्क हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. ही फक्त सुरुवात आहे – उद्या विद्यार्थी रस्त्यावर उतरले, महिला संघटना आवाज उठवू लागल्या, तर PMPML चं ‘महत्त्वाकांक्षी’ बजेट लोकशाहीत गुंडाळून फेकलं जाईल.

पुणेकरांना भाडेवाढ नकोय – त्यांना न्याय हवा आहे. PMPML ला हे समजायला हवं. आता भाडे कमी करा, अन्यथा लोकच निर्णय देतील — आणि तो बसच्या ब्रेकइतकाच जोरात लागेल!

भाग 1

क्रमशः

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...
error: Content is protected !!