दौंड प्रतिनिधी (संघराज गायकवाड मयुर साळवे)
या परिषदेमध्ये विविध देशांतील अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, विद्यार्थी व नामांकित प्राध्यापक सहभागी झाले होते. सर्व सादर केलेल्या संशोधन लेखांचे काटेकोरपणे परीक्षण करण्यात आले आणि डॉ. जाधव यांचा लेख उत्कृष्ट ठरला. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी भारतातून ते एकमेव प्रतिनिधी होते.
या यशामुळे दौंडकरांमध्ये अभिमानाची लाट पसरली असून, स्थानिक नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या डॉ. जाधव हे दौंड शहर व तालुका विकास विचार मंचाद्वारे सामाजिक कार्यात सक्रिय असून, पोद्दार शाळेतील नवोन्मेषी शिक्षण अभ्यासक्रम प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.
आगामी ३१ मे रोजी मेरी मेमोरियल शाळेच्या वतीने शांताई हॉटेल, दौंड येथे आयोजित व्याख्यानमालेत डॉ. जाधव हे माजी विद्यार्थी म्हणून “सामाजिक उद्योजकता” या विषयावर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाबाबत सर्व स्तरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, त्यांच्या व्याख्यानाची सर्वांनाच उत्सुकता वाटते.
























