Homeताज्या बातम्याPune Municipal Corporation: “सोशल मीडियाचा दबाव आणि विरोधकांच्या षडयंत्रामुळे पूजा मोरे...

Pune Municipal Corporation: “सोशल मीडियाचा दबाव आणि विरोधकांच्या षडयंत्रामुळे पूजा मोरे जाधवची माघार;भावनिक पत्रकार परिषद”

Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपच्या उमेदवार पूजा जाधवने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र टीका झाल्यामुळे पूजा जाधवने अर्ज मागे घेतला. यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन तिने आपली भूमिका स्पष्ट केली.

“विरोधकांनी षडयंत्र रचले आणि त्याची बळी मी ठरलो,” असेही तिने पत्रकार परिषदेत म्हटले. पूजा जाधव म्हणाल्या, “मी स्वतः हिंदू आहे आणि हिंदुत्वासाठी काम करणार आहे. आतापर्यंत झालेल्या चुकांबद्दल माफी मागते. जिथे भाजपला गरज आहे, तिथे मी काम करेन. वाघीण जखमी झाल्यावरही ती अजून अधिक जोमाने काम करते, तसेच मीही करू शकते.”

प्रेस कॉन्फरन्सदरम्यान भावनिक होतानाही पूजा जाधव रडताना दिसल्या. तिने आपल्या संघर्षकाळाबद्दल सांगितले, “माझा जन्म बीडच्या गेवराई तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. वडील ग्रामपंचायतीचे सरपंच होतेच नाहीत. मी शेतकऱ्यांसाठी काम करताना अनेक अडचणींचा सामना केला, पाच गुन्हे दाखल झाले, अनेक तास पोलीस स्टेशनमध्ये घालवले. तरीही संघर्ष करत राहिलो.”

पुढे तिने सांगितले, “छत्रपती संभाजीराजे यांच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करताना माझे आणि माझ्या पतीचे लग्न झाले. लग्नानंतर लगेच प्रभागासाठी काम सुरू केले. शेतकरी आणि कारखानदार यांच्यात संघर्ष करताना अनेक संकटांना सामोरे गेले. पहलगाम आणि काश्मीरच्या घटनांमध्ये धर्म विचारून हल्ले झाले, पण त्या घटना जनता पुढे नीट पोहोचल्या नाहीत. मी पक्षाच्या वरच्या स्तरावर घडलेल्या घटनांची ‘विक्टीम’ ठरलो.”

तिने विरोधकांवरही टीका केली, “सामान्य घरची मुलं उमेदवारी मिळवतात, हे सर्वांना सहन होत नाही. प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करताना मला विरोधकांच्या षडयंत्राचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर माझा जीवन आणि कामांचा चुकीचा अर्थ लावला गेला.”

या प्रसंगी तिने आपल्या पती धनंजय जाधवला देखील आभार मानले आणि म्हणाली, “राजकीय आयुष्य आमचं दोघांचं आहे. माझ्यामुळे तुमच्या राजकीय जीवनात अडचण आली असेल, तर माफी मागते.”

धनंजय जाधव यांचे विधान:
“आमच्या दोघांचा विवाह झाला, आमच्या दोघांची पक्षीय भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिली आहे. माझा संघर्ष टू-व्हीलरपासून इथंपर्यंत आहे. आम्ही प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो. सोशल मीडियाचा बळी माझी पत्नी ठरली आहे. माझ्या पत्नीचे शब्द नव्हते, ते तिच्या तोंडात घातले गेले. आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित ‘आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही’ हा स्टेटमेंट पूजा जाधव हिचा नव्हता.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले, “पहलगामच्या प्रकरणात तिनं काही चुकीचं केले नाही, ती स्वतः त्याची मांडणी करेल. कार्यकर्त्यांच्या निर्णयानुसार काय करता येते, हे आम्ही 2026 च्या पुणे शहरातील निवडणुकीतून दाखवले आहे.”

धनंजय जाधव यांनी प्रभाग क्रमांक 1 संदर्भात सांगितले, “प्रभाग क्रमांक 1 मध्ये तयारी केली, तिथल्या माताबहीनी, भाऊ आलेले आहेत. कोणत्याही पक्षाच्या सर्व्हेत आम्ही प्लस होतो. तिथं जे समीकरण झाली, निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली, त्याचा आम्ही स्वीकार करतो. प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांची, तसेच सुहास चव्हाण व आदिती बाबर यांची माफी मागतो.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!