Times of Maharashtra Desk, Pune Update : पुण्यात बहुतांश भागातील रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी पुण्यातील नगरिकाना प्रचंड त्रास होतो. काही महिन्यांपासून पुण्यातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. आणि याचे गांभीर्य लक्षात घेऊन आता पुणे महानगरपालिकेने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पुणे आता खड्डे मुक्त होणार आहे. पुण्यात महानगरपालिका “खड्डे मुक्त अभियान” राबवणार आहे. ही अभियान सोमवार 3 नोव्हेंबर पासून सुरू होणारआहे. यासाठी 15 पथके तयार करण्यात येणार असून प्रत्येक पथकास 10 किमी पर्यंतच्या रस्त्याची जबादरी देण्यात येणार आहे. तसेच 7 ठेकेदऱ्यांकडून ही काम करून घेतले जाणार आहे अशी माहिती पालिकेने दिली आहे.
दर वर्षी महानगरपालिकेच्या पथविभागाकडून ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान विविध शासकीय ,नीशासकीय आणि खाजगी संस्थान सेवावाहिन्या तकणीसाठी खोदाई करून 31 मे च्या आधी रास्ते पूर्ववत करण्याचे आदेश दिले जातात. तसेच पावसाळ्या पूर्वी रास्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी पथ विभागाची असते. पण यंदा अजून देखील पाऊस सुरूच आहे. यामुळे जागोजागी खड्ड्यात पाणी सचण्याच्या तक्रारी वाढत आहेत. यासाठी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाहणी केली असता शहरातील खड्ड्यांची गांभीर्याने दाखल घेत शहरात “खड्डे मुक्त अभियान” राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकर पुण्यातील नगरिकाना खड्डे मुक्त रास्ते पाहायला मिळणार आहेत. रस्त्याच्या कामातून ठेकेदाराना कोणता ही आर्थिक फायदा होणार नाही असे देखील पालिकेच्या आयुक्तांनी सांगितले त्यामुळे पुण्यात चांगले रास्ते तयार करून नगरिकांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात आहे.






















