Times of Mharastra: कालच सरकारने शेतकरी कर्ज माफीची तारीख जाहीर करत 30 जून 2026 पर्यंत निर्णय घेऊ असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. तर दुसरी कडे अजित दादानी सारख सारखं फुकट कशाला हवं अस म्हणत शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे सरकार नक्की कर्ज माफी देणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित दादांचा या वक्तव्याने नेमकं सरकारच्या मनात चाललय तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.बच्चू कडू यांनी नुकतेच शेतकरी कर्ज माफी साठी आंदोलन करत सरकारला वेठीस धरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी वर 30 जून पर्यंत निर्णय घेऊ असे आश्वासन देखील आंदोलकांना दिले होते. पण आता केलेल्या अजित दादांच्या वक्तव्याने सरकार ने वेळ मारून नेली का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नेमक काय म्हणाले अजित दादा?
“शुन्य टक्के व्याज दराने कर्ज दिल्यावर ते वेळच्या वेळी फेडायची सवय लावा ना. सारखं फुकटात, सारखं फुकटात, सारखं माफ, सारखं माफ, मग कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा शरद पवार यांच्या काळात कर्ज माफ झालं. एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कर्जमाफी झाली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना कर्जमाफी झाली. 2024 मध्ये आम्हाला निवडून यायचं होतं, आम्ही माफ करु आम्ही माफ करू, मग करा माफ. काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला.” अशा शब्दात अजितदादांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
अजित दादांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
शेतकरी सध्या संकटात असताना असं असंवेदनशीलपणे बोलूच नाही. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली असं वक्तव्य अजितदादांनी केलं. हे अत्यंत बेईमानीचं वक्तव्य आहे. म्हणजे लोकांचे मतं मिळवण्यासाठी तुम्ही बेईमानी केली. खोटी आश्वासनं दिली. मत मिळवल्यावर आता शेतकऱ्यांशी बेईमानी करताय. या बेईमानीचा बदला शेतकरी चून चून के घेतील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. आता कर्जमाफी खरंच होणार आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.






















