Times of Maharashtra, Mumbai Satya Morcha: महाविकास आघाडी व मनसे यांनी काढलेल्या सत्याचा मोर्चा विरोधात आता भाजप ही मैदानात उतरणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार भाजप विरोधकांच्या विरोधात मेगा आंदोलन करणार आहे. आज महाविकास आघाडी, मनसे आणि विरोधकांचा मुंबईत सत्याचा मोर्चा निघणार आहे. दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीटवरून हा मोर्चा निघणार असून पुढे महानगरपालिके हा मोर्चा वळणार आहे. पण आता या मोर्चा विरोधात भाजप ने देखील मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. मोर्चाविरोधात भाजप आज मुंबईत आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला मुक आंदोलन असे नाव देण्यात आले आहे. गिरगाव येथील टिळक मैदानात भाजप हे आंदोलन करणार असून सकाळ पासून मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा व काही आमदार हे मुक आंदोलन करणार आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चा विरोधात ही आंदोल आहे असे भाजपचे म्हणणे आहे. हे आंदोल देखिल दुपारी 1 वाजता सुरू होणार असून महाविकास आघाडीने लोकसभेत विजय मिळवला, तेव्हा सर्व काही योग्य होतं का? पराभवाचा झाल्यावर निवडणूक आयोग, मतदार यादी आणि यंत्रणांवर शंका का? असा सवाल करत रवींद्र चव्हाण, अमित साटम, मंगल प्रभात लोढांसह भाजप आमदारांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात येणार आहे.
राहुल नार्वेकर यांची मोर्चा विरोधात प्रतिक्रिया: आजचा हा मोर्चा हा निश्चितपणे हेतू पुरस्कर मोर्चा आहे त्याच्या फायद्यासाठी काढलेला हा मोर्चा आहे. यातून जनतेचा कुठलाही फायदा होणार नाही. संविधानिक संस्थांवर आरोप करणं, शंका उपस्थित करणं यातून काहीही साध्य होणार नाही. लोकसभा निवडणुकी वेळी निकालानंतर असे मोर्चे का काढले नाही? हे प्रश्न देखील जनता यांना विचारेल. त्यामुळे सभागृहात विषय मांडणे, संविधानिक व्यासपीठावर विषय मांडणे व त्यातून चर्चा करून काहीतरी उपाययोजना किंवा आपले विचार समोर आणणे यातच खारेपणा आहे






















