Times of Maharashtra, Mumbai Satya Morcha : निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा आहे. या मोर्चाची जोरात तयारी करण्यात आली असून राज्यातील सर्व विरोधक यात सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी सकाळपासून मुंबईत कार्यकर्ते येत आहेत या मोर्च्यात ऊद्धव ठाकरे , अदित्य ठाकरे , राज ठाकरे, अमित ठाकरे , जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार यांच्यासोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते ऊपस्थित राहणार असून दुपारी 1 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. या साठी मुंबईत सर्व पक्षांचे झेंडे जागोजागी लावण्यात आले आहेत.
खोट्या मतदारांविरुद्ध खरे मतदार जागे व्हा! अशाप्रकारच्या घोषणा मोर्चात दिल्या जाणार आहेत. बोगस मतदार यादी, यादीतील फेरफार असे गंभीर आरोप करत विरोधकांकडून हा मोर्चा काढला जातोय असे विरोधी पक्षाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाला वेठीस धरत मतदान यादीतील घोळ आणि मतचोरी यासाठी विरोधकांनी वज्रमूठ एकवटत ‘सत्याचा मोर्चा’ची हाक दिली आहे. सकाळ पासून मुंबईत बऱ्याच ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे






















