Times of Maharashtra Desk: हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी या त्यांच्या कुत्र्यासह संसद परिसरात आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या प्रकरणावर भाजप नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे. मात्र रेणुका चौधरी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की त्यांनी कोणताही नियम मोडलेला नाही, त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई होण्याचा प्रश्नच नाही. त्या मागे हटणार नाहीत. तसेच “जर माझ्याविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणायचा असेल तर आणा, मला काही फरक पडत नाही. पूर्वी अटल बिहारी वाजपेयीही बैलगाडीतून संसदेत आले होते. हिंदू धर्मात कुत्र्यांना महत्व आहे. मी कोणताही नियम मोडलेला नाही.” असे म्हणत बीजेपीला प्रत्युत्तर दिले आहे.
“मला वाटते आजकाल भारतात अशाच विषयांवर चर्चा होत आहे.” संसदेत कुत्राच मुख्य विषय झाला आहे. – लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी
संसदेत कुत्र्याच्या उपस्थितीवरून निर्माण झालेल्या वादावर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी व्यंगात्मक भाषेत म्हटले, “मला वाटते आजचा मुख्य विषय कुत्राच झाला आहे.”राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला, “बिचाऱ्या कुत्र्याने नेमकं काय केलं? कुत्र्यांना संसदेत येण्याची परवानगी नाही का? पाळीव प्राण्यांना आत येऊ देता का?”ते पुढे म्हणाले की कदाचित संसदेत पाळीव प्राण्यांना येण्यास मनाई असावी.शेवटी त्यांनी सरकारवर निशाणा साधत टिप्पणी केली, “आजकाल भारतात अशाच विषयांवर चर्चा होताना दिसते.”
दोन्ही नेत्यानी बीजेपी वर केलेल्या टिकेनंतर हा वाद आणखीन चिघळलेला आहे. आता या वर संसद काय सांगणार हा प्रश्न सर्वाना पडला आहे.






















