Homeताज्या बातम्याSatara Drug Seizure : सातारा ड्रग्ज प्रकरणावर राजकीय वाद पेटला : फडणवीसांची...

Satara Drug Seizure : सातारा ड्रग्ज प्रकरणावर राजकीय वाद पेटला : फडणवीसांची शिंदेंना पाठराखण, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल

Times of Maharashtra Desk:  साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरातील सावरी गावात काही दिवसांपूर्वी सुमारे 145 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा सापडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या ड्रग्ज साठ्याची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टपणे पाठराखण केली. विरोधक जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांचे नाव या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केले, त्याबद्दल मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. मात्र, या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांचे नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा, अयोग्य आणि निषेधार्ह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांचा कोणताही थेट संबंध आढळून आलेला नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.”

याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातही थोडक्यात भाष्य केले. “माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कोकाटे यांच्या आमदारकीचा राजीनामा किंवा अटक वॉरंट याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी स्वतः न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नये. संविधानाने न्यायव्यवस्था दिली आहे आणि कोण बरोबर, कोण चूक हे ठरवण्याचे अधिकार न्यायालयांकडे आहेत. जर मुख्यमंत्र्यांनीच क्लीन चिट द्यायची असेल, तर सगळी न्यायालयं बंद करा.”

अंधारे पुढे म्हणाल्या, “मी एकनाथ शिंदे यांचा थेट संबंध असल्याचे म्हटलेले नाही. माझा आरोप त्यांच्या बंधू प्रकाश शिंदे यांच्याबाबत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याचा फायदा प्रकाश शिंदेंना होऊ शकतो आणि त्यामुळे तपासावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. म्हणूनच काही काळ एकनाथ शिंदे यांनी पदापासून दूर राहावे, ही माझी मागणी आहे.”सातारा ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, आता सर्वांचे लक्ष पोलिस तपास आणि पुढील कायदेशीर कारवाईकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!