Homeताज्या बातम्याजे शरद पवारांचे झाले नाहीत, ते तुमचे काय होणार - ओवैसी

जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते तुमचे काय होणार – ओवैसी

Times of Maharashtra Desk: नाशिक सत्ताधारी मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात आणि निवडणुका आल्या की वेगवेगळे होतात, असा घणाघाती आरोप करत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मालेगाव येथे एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका, तेव्हाच मालेगावची खरी प्रगती होईल, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

ओवैसी म्हणाले, मालेगावमधील कचरा कंत्राट सत्ताधाऱ्यांकडेच असून शहरातील घाण आणि भ्रष्टाचार यांना तेच जबाबदार आहेत. “मालेगाव साफ ठेवायचा असेल तर सत्ताधाऱ्यांना कचऱ्यासारखे उचलून फेका आणि एमआयएमला साथ द्या, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मालेगावच्या पॉवरलूम उद्योगावर सध्या मोठे संकट आले असून अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे उद्योग अडचणीत सापडला आहे. मात्र, गेल्या १५ वर्षांत विरोधकांनी केवळ लूटमार केली, असा आरोप त्यांनी केला.

अजित पवार यांच्यावर टीका करताना ओवैसी म्हणाले, अजित पवार जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते तुमचे काय होतील? भाजपविरोधात एक वाक्य बोलले की संध्याकाळपर्यंत ते माघार घेतात, असा टोला त्यांनी लगावला. नाव न घेता त्यांनी स्थानिक नेत्यांवरही निशाणा साधत, तुमचा इथला प्यादा चारों खाने चित होईल,असे म्हटले.

मालेगाव महापालिकेच्या मोठ्या बजेटवर प्रश्न उपस्थित करत ओवैसी म्हणाले, हे पैसे नेमके कुठे जातात? सत्ताधारी रक्त पिण्याचे काम करत आहेत. एमआयएमची सत्ता आली तर तीन वर्षांत महापालिकेची स्थिती सुधारू, मालेगावसाठी व्हिजन प्लॅन तयार केला जाईल, असा दावा त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सत्ताधारी मुंबईत एकत्र असतात, पण निवडणुकांच्या वेळी वेगवेगळे होतात, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपच्या एका नेत्याकडून बनावट जन्म दाखल्याच्या मुद्द्यावरून मालेगावची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत, “आपला महापौर बसला की सगळ्यांचा हिशेब होईल, असा इशारा ओवैसी यांनी दिला. सरकारमध्ये मुस्लिमांचे प्रतिनिधित्व कमी असल्याने शिक्षण घ्या आणि एमआयएमला साथ द्या, असे आवाहन करत त्यांनी महिलांवरील अन्याय, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या आणि गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या गुंडाराजावरही तीव्र टीका केली. हा गुंडाराज संपवायचा असेल तर एमआयएमला निवडून द्या, असे आवाहन करत त्यांनी आपले भाषण संपवले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...
error: Content is protected !!