Times of Maharashtra Desk,West Bengal 2026 Assembly Elections: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी २०२६ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. नागपूरमधील अॅग्रो व्हिजन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस ज्या पक्षाला साथ देते, तो पराभूत होतो.मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, काँग्रेस दिल्लीत केजरीवाल, उत्तर प्रदेशात अखिलेश, बिहारमध्ये तेजस्वी यांना हरवले. आता बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सावध राहावे लागेल असा इशारा देत कॉँग्रेसवर टीका केली आहे.
नक्की काय म्हणाले शिवरज सिंह चौहान?
शिवरज सिंह चौहान यांनी कॉँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन झाले आहे आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक संतुलित मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. पण महाआघाडी आता एकसंध राहिलेली नाही; ती तुटत चालली आहे. कारण त्यांना लोकांच्या कल्याणाची काळजी नव्हती. त्यांचे युती सोयींवर आधारित होते आणि त्यांचे प्राधान्यक्रम चुकीच्या ठिकाणी होते. आणि आता हे स्पष्ट झाले आहे की काँग्रेस जिथे जिथे आघाडीत सामील होते तिथे पराभव निश्चित आहे.आधी कॉँग्रेसने दिल्लीत केजरीवाल यांना हरवले , मग उत्तर प्रदेश मध्ये अखिलेश आणि आता बिहार मध्ये तेजस्वी यांना हरवले. आता पुढे २०२६ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका येत आहेत. त्यावेळी ममताजीनी सावध राहावे. पुढचे नाव तुमचे असू शकते असे म्हणत कॉँग्रेस ल टोला मारला आहे.






















