Homeआरोग्यधक्कादायक घटना: मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या वसतीगृहात MBBS विद्यार्थ्याची आत्महत्या...

धक्कादायक घटना: मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या वसतीगृहात MBBS विद्यार्थ्याची आत्महत्या…

मुंबई :मुंबईतील भायखळा परिसरात स्थित जेजे रुग्णालयाच्या वसतीगृहात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव रोहन रामफेर प्रजापती असे असून, त्याने सोमवार (१० जून) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या खोलीत आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

 

रोहन प्रजापती हा जेजे रुग्णालयाच्या वसतीगृहात राहत होता आणि तिसऱ्या वर्षाचा वैद्यकीय अभ्यासक्रम करत होता. प्राथमिक माहितीनुसार, अभ्यासाचा वाढता ताण आणि घरातील आर्थिक अडचणी यामुळे रोहन मानसिक तणावाखाली होता. या तणावाला कंटाळून त्याने पंख्याला गळफास लावून आयुष्य संपवलं.

घटनेनंतर साथीदारांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी रोहन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मध्यरात्री त्याला मृत घोषित केलं.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

या प्रकरणी जेजे मार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी तपास करत असून, प्राथमिक चौकशीत आत्महत्येमागे अभ्यासाचा दडपण आणि आर्थिक संकट हेच प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येने महाविद्यालयीन वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे.

याआधी पुण्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. रूबी क्लिनिकमध्ये कार्यरत असलेल्या एका २८ वर्षीय डॉक्टरने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनांनी वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांवरील तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणी वर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!