संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून AIMIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत थेट आव्हान दिले आहे. “जर इतिहासाचा दाखला देऊन शहरांची नावे बदलायची असतील, तर पुण्याचे नाव फुलेवाडा, कोल्हापूरचे नाव शाहू महाराजांवर आणि नागपूरचे नाव बाबासाहेब आंबेडकर नगरी करावे,” असे जलील यांनी म्हटले आहे. सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून सुरू असलेल्या राजकारणावरही भाष्य केले.
जलील यांनी मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नामांतरापेक्षा आज रस्ते, पाणी आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. “मी मुस्लिम आहे म्हणून लोक मला जातीच्या दृष्टिकोनातून पाहतात. मी असे राजकारण करत नाही. गेल्या 40 वर्षांपासून औरंगाबादच्या नावावरून फक्त राजकारण सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा पुढे आणला जातो, हे दुर्दैवी आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नामांतरापेक्षा मूलभूत प्रश्न महत्त्वाचेजलील यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून सरकारवर राजकारणाचा आरोप केला. “आंतरराष्ट्रीय स्तरावर औरंगाबादची ओळख आहे. येथे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. पण आज आपल्याकडील सर्व प्रश्न सुटले आहेत का? ज्या संभाजी महाराजांच्या नावावर हे शहर ठेवण्यात आले, त्या शहरात आजही 10 दिवसांनी पिण्याचे पाणी येते. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
“हिम्मत असेल तर नावे बदला””
जर इतिहासाचा मुद्दा पुढे करून शहरांचे नामांतर करायचे असेल, तर सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, मग पुण्याचे नाव फुलेवाडा करावे. नागपुरात दीक्षाभूमी आहे, तर नागपूरचे नाव बाबासाहेब आंबेडकर नगरी करावे. कोल्हापूरला शाहू महाराजांमुळे ओळख आहे, मग कोल्हापूरचे नाव शाहू महाराजांवर करावे. हिम्मत असेल तर सरकारने ही नावेही बदलावीत,” असे थेट आव्हान जलील यांनी सरकारला दिले
.नामांतरावरून राजकारण नकोजलील यांनी संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. “माझा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला नाही. पण नामांतराच्या नावाखाली राजकारण करणे चुकीचे आहे. औरंगाबादच्या नावावरून गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय खेळ खेळला जात आहे. त्याऐवजी मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे,” असे ते म्हणाले
.या मुलाखतीत जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्या या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.























