नवीन नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा सन्मान
शरद पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे आणि मेहनतीमुळे पक्ष आज या टप्प्यावर पोहोचला आहे. निलेश लंके यांचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की, ‘रात्री १२ नंतरही लोकांशी भेटणं ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. असे कार्यकर्तेच पक्षाचा खरा आधार आहेत.'”
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या वक्तव्याचे समर्थन करत पवार म्हणाले, “जयंतरावांनी योग्यच म्हटले आहे की नव्या पिढीला संधी द्यायला हवी. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून, सामूहिक निर्णय घेतला पाहिजे.”
Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇
प्रत्येक तालुक्यात नवीन चेहऱ्यांची गरज
पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रत्येक तालुका व जिल्ह्यात नवे चेहरे दिसले पाहिजेत. कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, जेणेकरून राज्य चालवण्यास सक्षम नेतृत्व घडू शकेल.”
राष्ट्रहित व राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च
देशाच्या सुरक्षेबाबत बोलताना पवार म्हणाले, “पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला, तेव्हा आम्ही सरकारवर टीका केली नाही. कारण देशाच्या सुरक्षेसंदर्भात कोणताही कठोर निर्णय घेतला जात असेल, तर त्याचं समर्थन करायला हवं. राष्ट्रहित हे सर्वोच्च आहे.”
शेजारील देशांशी सुसंवादाचा अभाव चिंताजनक
शेजारील देशांशी असलेल्या नातेसंबंधांवर चिंता व्यक्त करत पवार म्हणाले, “आज पाकिस्तान, बांगलादेश, चीन, श्रीलंका हे आपले मित्र राहिलेले नाहीत. या देशांशी संवादाची स्थिती सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली आहे. हे भविष्या साठी चिंताजनक आहे.”























