Times of Maharashtra Desk, : सिंधुदुर्गमध्ये शिंदे आणि बीजेपी युती वाद कही दिवसांपासून सुरू आहे. यामुळे काही दिवसांपासून नितीश राणे आणि नीलेश राणे यांच्यामध्ये मतभेद देखील होत होते. तसेच भाजप नेते नारायण राणे यांना संपवण्याचा कट सुरु आहे. राणे साहेब तुम्हाला प्रचारात कुठे दिसतात का?. नारायण राणे यांना युती हवी होती. पण त्यांचा शब्द मानला नाही” असा दावा दीपक केसरकर यांनी केला होता. यावर प्रतीक्रिया व्यक्त करत मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. ते म्हणाले नारायण राणे यांची इच्छा होती, जिल्ह्यामध्ये युती व्हावी, रत्नागिरीमध्ये युती झाली पण सिंधुदुर्गमध्ये युती होऊ शकली नाही, विरोधक असेही म्हणत आहेत नारायण राणे यांचा शब्द मानला गेला नाही, यावर मी इतकंच बोलेन नारायण राणे यांची इच्छा होती की शहर विकास आघाडी होऊ नये, कणकवलीत शहर विकास आघाडी होऊ नये, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये, हे विधान देखील नारायण राणे यांचं होतं, शेवटी नारायण राणे हे एक प्रगल्भ नेते आहेत, त्यांना युती आघाड्या सर्व समजतं, ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना राज्य कसं चालवायचं, कशा युती, आघाडी होतात, हे सर्व आयुष्यभर अतिशय बारकाईने त्यांनी पाहिलेलं आहे, म्हणून प्रस्ताव आले गेले, टेबलावर नेमकं काय झालं? याची माहिती त्यांना असते, असं नितेश राणे यांनी सांगितल.
तर पुढे ते अस देखील म्हणाले की नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत तसेच अतिशय उत्तम संवाद नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील आहे, म्हणून त्या लोकांना माहिती आहे, काय विषय आहे तो, त्यामुळे त्यांना युतीबाबत सर्व परिस्थिती माहिती आहे, युती कशी होते वगैरे, काय मागण्या केल्या सर्व माहिती टेबलावर मिळालेली आहे. आता आपल्याला फक्त एक चुकीचं चित्र दिलं जातं, आम्ही सगळेच द्यायला तयार होतं, ते नगरअध्यक्ष पद मागत होते, भाजपाकडून त्यांच्या हक्काचं नगराध्यक्ष पद मागत होते, आम्ही त्याबद्दल काही बोललो नाही, गप्प होतो, इतका वेळ, कारण आम्हाला माहिती आहे की विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही.
निलेश राणे यांचा देखील बळीचा बकरा केला जात आहे, त्यांना एकटं पाडलं जात आहे – नितीश राणे
प्रतीक्रिया व्यक्त करताना नितीश राणे यांनी दीपक केसारकरांवर अनेक प्रश्न उठवले आहेत. ते म्हणाले २०१९ पासून मल्टी स्पेशालिस्टची जागा जी क्लियर झालेली, तरीपण केसरकारांना का जमलं नाही जागा भरून देणं? आरोग्यवस्थेबद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्लेचे लोक आजही बोंब का मारत आहेत. दीपक केसरकर आमदार आहेत ना, मंत्री झालेले आहेत, केसरकरांनी याबद्दल उत्तर दिले पाहिजे, आरोग्याची व्यवस्था का केली नाही? डॉक्टर का दिला नाही? का इथल्या लोकांना आरोग्यासाठी गोव्याला जावे लागत आहे? जर त्यांच्या कडे याच उत्तर नसेल तर त्यांनी याच्यामध्ये उगाच कोणी राजकारण करू नये, आमच्या रवींद्र चव्हाण यांच्यावरती कोणीही आरोप करू नये, रवींद्र चव्हाण यांनी नारायण राणे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, आमच्यासाठी विधानसभेला काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे, निलेश राणे यांचा देखील बळीचा बकरा केला जात आहे, त्यांना एकटं पाडलं जात आहे, का दुसरा कोणता शिवसेनेचा नेता बोलत नाही, का बोलत नाही, उदय सामंत येऊन रवींद्र चव्हाणांवरती का टीका करत नाहीत, निलेश राणे यांच्या समर्थनार्थ त्यांच्यातील एकही नेता का उतरत नाही? तिकडे ते गुलाबराव पाटील राज्यातल्या कुठल्यातरी एका जिल्ह्यातल्या कुठल्यातरी एका शहराच्या नगरपालिकेसाठी नारायण राणेंची कशी खिल्ली उडवत आहे ते दाखवू का व्हिडिओ? मग बाकी कोण का बोलत नाहीत, फक्त निलेश राणेच बोलत आहेत, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला, त्यांना काय पाडला जात आहे, दीपक केसरकर का रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत नाहीत, या बाबतीमध्ये दोन तारखेनंतर जसं निलेश राणे बोलले आहेत, फडणवीसांसोबत बसून, रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बसू महायुती मधून यातून काय मार्ग निघतो ते पाहू अस म्हणत नितीश राणे यांनी आपला भाऊ नीलेश राणे यांची बाजू घेतली आहे. आता हे भावभवा मधील राजकारण अजून कोणते वळण घेणार असा प्रश्न सर्वाना पडला आहे.






















