Homeमहत्त्वाचेसोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष!

सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष!

Times Of Maharashtra Desk : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, सोलापूर जिल्हा परिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेसाठी एकूण 68, तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले असून, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे.

मोहोळमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) आघाडीवर

मोहोळ तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार विजयराज डोंगरे यांनी पहिल्याच फेरीत आघाडी घेतली आहे.
तसेच आष्टी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमित व्यवहारे हे विजयी झाले आहेत.

माळशिरसमधील प्रतिष्ठेच्या लढतीत भाजप आघाडीवर

माळशिरस तालुक्यातील प्रतिष्ठेच्या दहिगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या संस्कृती राम सातपुते यांनी आघाडी घेतली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे विद्यमान आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर हे पिछाडीवर आहेत.

महूद गटात शिवसेनेचा विजय

महूद जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे दादा लवटे हे विजयी झाले आहेत. तर पंचायत समितीमधून बाळासाहेब बंडगर आणि सोनाली पाटील हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे.

सोलापूर जिल्हा परिषद – प्रमुख विजयी उमेदवार

  • करमाळा (11 जागा)

    • रश्मी बागल (भाजप) – पांडे गट

  • माळशिरस

    • संस्कृती सातपुते (भाजप) – दहिगाव गट

  • दक्षिण सोलापूर

    • नेताजी खंडागळे (भाजप) – बोरमणी जिल्हा परिषद गट

  • अक्कलकोट

    • शांभवी कल्याणशेट्टी (भाजप) – चपळगाव जिल्हा परिषद गट

इतर तालुक्यांतील निकाल हळूहळू स्पष्ट होत असून मतमोजणी अद्याप सुरू आहे.

दरम्यान, पंचायत समितीच्या 136 जागांचे निकालही टप्प्याटप्प्याने जाहीर होत असून पुढील काही तासांत सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!