Homeताज्या बातम्याMumbai : दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्र नाचवला, मराठी तरूणाई बरबाद केली; आमदार संजय...

Mumbai : दक्षिण भारतीयांनी महाराष्ट्र नाचवला, मराठी तरूणाई बरबाद केली; आमदार संजय गायकवाड यांचं विधान

मुंबई : आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मॅनेजरला मारहाण केलेले आमदार संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहे. दक्षिण भारतातील लोकांनी महाराष्ट्र नाचवला. लेडीज बार, डान्सबारमध्ये महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद केली.

महाराष्ट्राची संस्कृती खराब केली. आज तुम्हाला त्यांचा एवढा पुळका का येतो, मी जे केले मराठी माणसासाठी केले असं सांगत आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मॅनेजर मारहाण प्रकरणावर भाष्य केले आहे. संजय गायकवाड यांच्या कृत्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यावर गायकवाडांनी प्रत्युत्तर दिले.
आमदार संजय गायकवाड म्हणाले की, मी जे केले ते इथल्या माणसांसाठी केले मग दक्षिण भारतीयांचा तुम्हाला पुळका का आलाय? जर समज देऊन, तक्रार देऊन हे सरळ होत नसतील तर या मार्गाने तात्काळ कारवाई झाली हे आपण पाहिले. मग माझा निर्णय चुकीचा होता की योग्य होता ठरवा. शेवटी ती मारहाण होती. मला आयपीसी कायदे वैगेरे माहिती आहेत. हे फक्त एनसीचे प्रकरण आहे. यात कायद्यानुसार कुठेही शिक्षेची तरतूद नाही. मीपण केसेस लढल्या आहेत. विधान भवनाच्या आत हे असल्याने मी अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना माझी बाजू समजवून सांगेन. माझी चूक असेल तर त्याला जी शिक्षा असेल त्याला सामोरे जायला मी तयार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मार्ग माझा चुकीचा होता हे माहिती होते पण या घटनेसाठी मला करावे लागले. मी वेटरला नाही तर मॅनेजरला मारले. २००-४०० तक्रारी गेल्या ४-५ वर्षात झाल्यानंतरही कॅन्टीनवर कारवाई केली नाही. कारवाईसाठी सांगूनही २-२ महिने अहवाल यायचा नाही.
यामागे कुणाचे साटेलोटे होते, हा माणूस लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत होता. मला स्वतःला पोटाचा आजार आहे. काही वेडेवाकडे खाल्ले तर मला त्रास होतो. त्यामुळे मी कधी बाहेरचे खात नाही. मला इतके विषारी जेवण दिले जात असेल त्यानंतर माझी जी रिअँक्शन होती ती चुकीची वाटत नाही असंही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं.
दरम्यान, अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई झाली. त्यामुळे माझा मार्ग चुकीचा होता तरीही मला तो अवलंबावा लागला. त्यामुळेच आज ही कारवाई झाली. येणाऱ्या काळात लाखो लोकांचे आरोग्य त्यातून वाचणार आहे असंही आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड; ऑपरेशनसाठी चार वेळा उपाशी ठेवूनही शस्त्रक्रिया लांबणीवर

0
ठाणे : उल्हासनगर येथील शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील कथित गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकुमार पासी या रुग्णाला शस्त्रक्रियेच्या...

सिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

0
गडचिरोली (प्रतिनिधि जाबिर खान): गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत श्री.एम. रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री.कार्तिक मधिरा मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान)तसेच श्री गोकुल राजजी अपर पोलीस...

नागपुरातपहिल्यांदाचउलगडणार ‘क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुले’ यांच्याजीवनावरीलमहानाट्य!

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रंगमंचावर जिवंत...

ईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

0
(तालुका प्रतिनिधी जाबिर खान): दि. 26 मे 2026 रोजी सिरोंचा पोलीस स्टेशन येथे SDPO संदेश नाईक आणि M.K. नांदे यांच्या उपस्थितीत ईद-उल-अजहा (बकरी...

देऊळगाव राजा शहर व परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी.

0
देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे ):दिनांक २५ मे २०२६ रोजी देऊळगाव राजा शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...

उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड; ऑपरेशनसाठी चार वेळा उपाशी ठेवूनही शस्त्रक्रिया लांबणीवर

0
ठाणे : उल्हासनगर येथील शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील कथित गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकुमार पासी या रुग्णाला शस्त्रक्रियेच्या...

सिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

0
गडचिरोली (प्रतिनिधि जाबिर खान): गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत श्री.एम. रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री.कार्तिक मधिरा मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान)तसेच श्री गोकुल राजजी अपर पोलीस...

नागपुरातपहिल्यांदाचउलगडणार ‘क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुले’ यांच्याजीवनावरीलमहानाट्य!

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रंगमंचावर जिवंत...

ईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

0
(तालुका प्रतिनिधी जाबिर खान): दि. 26 मे 2026 रोजी सिरोंचा पोलीस स्टेशन येथे SDPO संदेश नाईक आणि M.K. नांदे यांच्या उपस्थितीत ईद-उल-अजहा (बकरी...

देऊळगाव राजा शहर व परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी.

0
देऊळगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे ):दिनांक २५ मे २०२६ रोजी देऊळगाव राजा शहर व परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...
error: Content is protected !!