Homeताज्या बातम्याऑर्किड्स स्कूलवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे ; पत्रकार परिषदेत शाळेच्या सचिव...

ऑर्किड्स स्कूलवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे ; पत्रकार परिषदेत शाळेच्या सचिव शाहेदा खान यांचे प्रतिपादन…

ऑर्किड्स स्कूलला काही समाज कंटकांकडून नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न…
पुणे – गेल्या २० वर्षांपासून अत्यंत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ऑर्किड्स स्कूलला काही समाजकंटकांकडून नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकारामुळे शाळेचे व्यवस्थापन तसेच पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे आमचे आवाहन आहे की, ऑर्किड्स स्कूलची तात्काळ बदनामी थांबवावी, असे प्रतिपादन भवानी पेठेतील ऑर्किड्स स्कूलच्या सचिव शाहेदा खान तसेच मुख्याध्यापिका हिना शेख यांनी केले.
पत्रकार परिषदेत बोलताना शाहेदा खान यांनी सांगितले की, शाळा परिसरात राहणाऱ्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन शाळेसंदर्भात धांदात खोटे दावे केले. आमच्या शाळेची बंगले हे पूर्णपणे मजबूत असून, ती केवळ १० वर्षे जुनी आहे. सीओईपीच्या इंजीनिअर्सनी इमारतीबाबत अहवाल दिला आहे. त्यामध्ये शाळेची बंगले सर्व चांगले असल्याचे अहवाल दिले आहे. त्यामुळे शाळेची इमारत जीर्ण असल्याचा आरोप निखालस खोटा आहे. आमच्या शाळेची जागा एक बिल्डर आणि परिसरातील काही समाजकंटक नागरिकांना हडपायची असल्या कारणाने ते आमच्या शाळेवर खोटेनाटे आरोप करीत आहेत.
 
                     👇👇 पहा व्हिडीओ 👇👇

👆👆  पहा व्हिडीओ 👆👆

शाहेदा खान यांनी सांगितले की, आमच्या शाळेत गरीब व सर्वसमान्य नागरिकांची मुले शिकत आहेत. दर्जेदार शिक्षणामुळे शाळेच्या कामकाजावर पालकदेखील खुश आहेत. या स्थितीत संस्थेची बदनामी करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. आमच्या शाळेची फी खूप जास्त असल्याचा आरोप होतो. तोही पूर्णपणे खोटा आहे. परिसरातील काही नालायक लोक आमच्या आमच्या संस्थेची बदनामी सोशल मीडियावर करीत आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आमची शाळा ही पूर्णपणे शासकीय मान्यता प्राप्त असून, सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करीत असतो. खरेतर शाळेच्या परिसरात जी फ्लॅट आहेत, त्या फ्लॅटच्या मालकांना एका बिल्डरने हाताशी धरून शाळेची जागा हडपण्यासाठी बदनामीचा घाट घातला आहे. परंतु आम्हीही याविरोधात लढणार. काहीही झाले तर विद्यार्थी व पालकांसाठी आम्ही लढत राहण्याचा निर्धार केला असल्याचे शाहेदा खान यांनी या वेळी सांगितले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!