Homeताज्या बातम्याजलसंपदा विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा महापालिकेचा विचार...

जलसंपदा विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा महापालिकेचा विचार…

 

जलसंपदा विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा महापालिकेचा विचार…

 

पुणे : उन्हाच्या झळा वाढू लागताच पुण्यात पाणीप्रश्नानेदेखील उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. त्यातच आता पुणे महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचा दावा करीत जलसंपदा विभागाने तब्बल ४७८ कोटी रुपयांची थकबाकी याप्रकरणी दाखवली आहे.

आता हे प्रकरण चिघळले असून याप्रकरणी महापालिका जलसंपदा विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा विचार करीत आहे.

पुणे महापालिका मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाण्याचा कोटा वापरत आहे, असा दावा करुन जलसंपदा विभागाने महापालिकेला दंड आकारला आहे. पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या बिलात महापालिकेकडे ४७८ कोटी रुपयांची थकबाकी दाखवली आहे. थकबाकीवर जलसंपदा विभागाने तोडगा काढावा, यासाठी महापालिकेने चर्चा केली होती. तसेच ही बाब राज्य शासनाच्या निर्देशानास आणून दिली होती. मात्र त्यातून मार्ग निघत नसल्याने तसेच जलसंपदा विभागाने दंड भरण्याचा तगादा महापालिकेच्या मागे लावल्याने या विरोधात महापालिका उच्च न्यायालयाकडे धाव घेण्याच्या विचारात आहे.

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पुणे महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो, असे सांगितले जात आहे, परंतु महापालिकेने केलेला हा दावा खोटा असून या गावांमध्ये जलसंपदा विभागच पाणीपुरवठा करत आहे, असे या विभागाचे म्हणणे आहे. जलसंपदा विभागाने यासंदर्भात महापालिकेला पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे समाविष्ट गावांचा सुमारे पावणेदोन टीएमसीचा कोटादेखील मान्य कोट्यातून कमी करण्यात आला आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाने महापालिकेला एप्रिल महिन्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे बिल पाठवले आहे. या बिलात एकूण रकमेची मागणी १,१९६ कोटी दाखविण्यात आली आहे. त्यापैकी पुणे महापालिकेने ८५९ रुपये पाटबंधारे विभागाला अदा केले आहेत. तर ४७८ कोटी रुपये देणे बाकी आहेत.

महापालिकेला ही पाणीपट्टी मान्य नसल्याने या संदर्भात यापूर्वी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे बैठका झाल्या आहेत. पण त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता महापालिकेने या संदर्भात अधिकाऱ्यांच्या स्तरावर चर्चा न करता वकिलांमार्फत कायदेशीर लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या प्रस्तावाला आयुक्तांची मान्यता घेण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या बिलामध्ये मार्च २०१६ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीतील एकूण पाणीपट्टी आकारणी १,१९६.८३ कोटी असून, त्यापैकी महापालिकेने ८५९.३६ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. पण पाटबंधारे विभागाने थकबाकी ३३७.४७ कोटींऐवजी ४७८.३२ कोटी रुपये दाखवली आहे, पाटबंधारे विभागाने १४६.८५ लाख रुपयांची रक्कम जास्त दाखवली आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा चुकीचा असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

शिरपूरतालुक्यातमतदारयादींचेसखोलपुर्ननिरीक्षणकार्यक्रमसुरू

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात...

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची धडाकेबाज कारवाई

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आपल्या तत्पर व परिणामकारक कामगिरीची छाप...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर घालून...

0
जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र...

₹२.५६ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीत खान्देशला डावलले?; सत्ता असूनही जळगावला मेगा प्रकल्पाची प्रतीक्षा कायम

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र शासनाने राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी तब्बल ₹२.५६ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे १८ मेगा प्रकल्प जाहीर केले आहेत. या...

मोबाईलपासूनमैदानाकडे… नगरसेविकास्वातीनिलेशसावंतयांचाप्रेरणादायीउपक्रम; मुलांनाक्रीडासाहित्याचेवाटप

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ येथील नगरसेविका स्वाती निलेश सावंत...

शिरपूरतालुक्यातमतदारयादींचेसखोलपुर्ननिरीक्षणकार्यक्रमसुरू

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक कर्मचारी अन लोकप्रतिनिधींची भूमिका ठरणार महत्त्वाची शिरपूर- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात...

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांची धडाकेबाज कारवाई

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी आपल्या तत्पर व परिणामकारक कामगिरीची छाप...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचा स्तुत्य उपक्रम; वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत साजरा करत समाजासमोर घालून...

0
जामनेर (प्रतिनिधी विनोद पवार): जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गावातील इलेव्हन स्टार मित्र...
error: Content is protected !!