Homeताज्या बातम्याजलसंपदा विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा महापालिकेचा विचार...

जलसंपदा विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा महापालिकेचा विचार…

 

जलसंपदा विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा महापालिकेचा विचार…

 

पुणे : उन्हाच्या झळा वाढू लागताच पुण्यात पाणीप्रश्नानेदेखील उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. त्यातच आता पुणे महापालिका मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचा दावा करीत जलसंपदा विभागाने तब्बल ४७८ कोटी रुपयांची थकबाकी याप्रकरणी दाखवली आहे.

आता हे प्रकरण चिघळले असून याप्रकरणी महापालिका जलसंपदा विभागाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा विचार करीत आहे.

पुणे महापालिका मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाण्याचा कोटा वापरत आहे, असा दावा करुन जलसंपदा विभागाने महापालिकेला दंड आकारला आहे. पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या बिलात महापालिकेकडे ४७८ कोटी रुपयांची थकबाकी दाखवली आहे. थकबाकीवर जलसंपदा विभागाने तोडगा काढावा, यासाठी महापालिकेने चर्चा केली होती. तसेच ही बाब राज्य शासनाच्या निर्देशानास आणून दिली होती. मात्र त्यातून मार्ग निघत नसल्याने तसेच जलसंपदा विभागाने दंड भरण्याचा तगादा महापालिकेच्या मागे लावल्याने या विरोधात महापालिका उच्च न्यायालयाकडे धाव घेण्याच्या विचारात आहे.

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना पुणे महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो, असे सांगितले जात आहे, परंतु महापालिकेने केलेला हा दावा खोटा असून या गावांमध्ये जलसंपदा विभागच पाणीपुरवठा करत आहे, असे या विभागाचे म्हणणे आहे. जलसंपदा विभागाने यासंदर्भात महापालिकेला पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे समाविष्ट गावांचा सुमारे पावणेदोन टीएमसीचा कोटादेखील मान्य कोट्यातून कमी करण्यात आला आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाने महापालिकेला एप्रिल महिन्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे बिल पाठवले आहे. या बिलात एकूण रकमेची मागणी १,१९६ कोटी दाखविण्यात आली आहे. त्यापैकी पुणे महापालिकेने ८५९ रुपये पाटबंधारे विभागाला अदा केले आहेत. तर ४७८ कोटी रुपये देणे बाकी आहेत.

महापालिकेला ही पाणीपट्टी मान्य नसल्याने या संदर्भात यापूर्वी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे बैठका झाल्या आहेत. पण त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता महापालिकेने या संदर्भात अधिकाऱ्यांच्या स्तरावर चर्चा न करता वकिलांमार्फत कायदेशीर लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या प्रस्तावाला आयुक्तांची मान्यता घेण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या बिलामध्ये मार्च २०१६ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीतील एकूण पाणीपट्टी आकारणी १,१९६.८३ कोटी असून, त्यापैकी महापालिकेने ८५९.३६ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. पण पाटबंधारे विभागाने थकबाकी ३३७.४७ कोटींऐवजी ४७८.३२ कोटी रुपये दाखवली आहे, पाटबंधारे विभागाने १४६.८५ लाख रुपयांची रक्कम जास्त दाखवली आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा चुकीचा असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य...

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

0
माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

हस्तनपूर परिसरात बिबट्याचा वावर वासरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

0
जिल्हा (प्रतिनिधी धनंजय कावडे शिखर शिंगणापूर): सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील हस्तनपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हस्तनपूरसह...

शारदा हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास तलवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई येथील शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने तलवाडा येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य...

चार दिवस उलटले आरोपी अजूनही फरार गोरेगाव लोणेरेत संतापाचा स्फोट न्यायासाठी जनआक्रोश उसळला

0
माणगाव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये २२ वर्षीय पल्लवी प्रवीण मोरे (रा. वडगाव बौद्धवाडी) या तरुणीवर अत्यंत क्रूर अत्याचार करून तिची...

नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

0
 निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : निफाड तालुक्यातील पिंपळस परिसरात २३ तारखेला दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...
error: Content is protected !!