Homeताज्या बातम्याएकट्याने निवडणूक लढण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे संतप्त म्हणाले, बिहार हारून सुद्धा इतका...

एकट्याने निवडणूक लढण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे संतप्त म्हणाले, बिहार हारून सुद्धा इतका आत्मविश्वास ..

Times of Maharashtra Desk : मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना, महाविकास आघाडी मध्ये गोंधळ उडाला आहे.कॉँग्रेसने आघाडीपासून लांब राहून एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा अतिआत्मविश्वास आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बिहार हारून सुद्धा इतका आत्मविश्वास.. , काँग्रेसने प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष देऊ नये. – उद्धव ठाकरे

नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला तरी कॉँग्रेसला स्वतः निवडणूक लढायची आहे, जर काँग्रेस खरोखरच इतकी आत्मविश्वासू असेल तर त्याचे कौतुक करायला हवे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी कॉँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी मुंबईसारखी मोठी आणि महत्त्वाची निवडणूक एकट्याने लढवण्याच्या योग्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच कॉँग्रेसने शिवसेना आणि मनसे यांच्यातील जवळीक त्यांना हानी पोहोचवू शकते म्हणून आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार आहोत असे वक्तव्य केले होते. कॉँग्रेसच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी बिहारमध्ये शिवसेना किंवा मनसे नव्हते, तेव्हा तिथे काँग्रेसचा इतका दारुण पराभव कसा झाला? असा प्रश्न उपस्थित करत निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात आणि काँग्रेसने प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष देऊ नये असा इशारा राहुल गांधी यांना दिला आहे.

राज ठाकरे लोकशाही वाचवण्याच्या लढाईतही विरोधकांसोबत उभे राहिले, मग काँग्रेसला त्यांच्याशी का अडचण आहे? – उद्धव ठाकरे
शिवसेना आणि मनसेमधील जवळीक मुस्लिम आणि उत्तर भारतीयांची मते काँग्रेसपासून दूर होऊ शकतात ही काँग्रेसची भीतीही युबीटीने फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरे यांचे असे मत आहे की मुंबईतील मुस्लिम आणि हिंदी भाषिक समुदाय भाजपच्या धोरणांवर नाराज आहेत म्हणून महाविकास आघाडीवर त्यांचा विश्वास आहे. जर मुंबईत “स्वावलंबन” हा नारा असेल, तर काँग्रेस उर्वरित २७ नगरपालिका एकट्याने लढवेल का? राज ठाकरे लोकशाही वाचवण्याच्या लढाईतही विरोधकांसोबत उभे राहिले, मग काँग्रेसला त्यांच्याशी का अडचण आहे? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी कॉँग्रेससमोर उभे केले आहेत.

“काँग्रेसने वेगळा मार्ग स्वीकारला असला तरी महाविकास आघाडी एक आहे – उद्धव ठाकरे
काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांचा निर्णय आहे. पण “काँग्रेसने वेगळा मार्ग स्वीकारला असला तरी महाविकास आघाडी एक आहे .राज ठाकरेंच्या प्रवेशामुळे मुंबईतील मराठी मतदारांमध्ये एकता वाढेल असा विश्वास आम्हाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

0
Times Of Maharashtra Desk पुणे : सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका २७ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत....

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

0
Times Of Maharashtra Desk पुणे : सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका २७ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत....

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...
error: Content is protected !!