Times of Maharashtra Desk: डिसेंबर 2025: राज्यसभेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि आधीच आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण संसदेत निर्माण झाले आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे हा विषय संसदेत चर्चा सुर झाली आहे झाली.जगदीप धनखड यांनी या वर्षी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यघटनेच्या कलम ६७(अ) चा हवाला देत आरोग्याच्या कारणास्तव आणि वैद्यकीय सल्ला पाळण्याच्या गरजेमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. त्यामुळे राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे आणि जेपी नड्डा यांच्यात संघर्ष सुरू झालेला आहे.
या आरोप प्रत्यारोपात सभागृह नेते जेपी नड्डा यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विनोदही केला. अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांच्या स्वागत भाषणादरम्यान, खर्गे यांनी धनखड यांच्या अचानक राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करून खोचक टीका केली.खर्गे म्हणाले, “सभागृहाच्या अध्यक्षांच्या अचानक राजीनाम्याचा उल्लेख करावा लागल्याबद्दल मला दु:ख आहे. अध्यक्ष हे सरकार आणि विरोधी पक्षांसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. संपूर्ण विरोधी पक्षाच्या वतीने मी त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.”
त्यांच्या या भाष्यावर प्रतिक्रिया देताना जेपी नड्डा म्हणाले, “आपण संसदेची प्रतिष्ठा राखली पाहिजे. बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्रातील पराभवामुळे तुम्हाला वेदना झाल्या आहेत; आपले दुःख डॉक्टरांना सांगा.” त्यांनी धनखड यांच्या विरोधात दोनदा अविश्वास प्रस्ताव आणण्यावर चर्चा न करण्याचेही स्पष्ट केले.
राजकीय वर्तुळात धनखड यांचा राजीनामा चर्चेचा मुख्य विषय ठरला असून हिवाळी अधिवेशनाचे वातावरण सुरुवातीपासूनच तणावपूर्ण बनले आहे






















