Times of Maharashtra Desk : महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय समोर आला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणी पुढे ढकलण्यासोबतच आचारसंहितेची अंमलबजावणीची मुदतही वाढवली आहे. न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले असून यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल झालेला आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. काही नगरपरिषदांच्या खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणी प्रलंबित असल्याने राज्यातील सुमारे २० नगरपरिषदांचे मतदान पुढे ढकलण्यात आले होते.
आता या निवडणुका २० डिसेंबर रोजी होतील.याचिकेत सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर करावेत अशी मागणी करण्यात आली होती, अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज झालेल्या सर्व नगरपालिका निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिले. आधी हे निकल ३ डिसेंबर रोजी लागणार होते ते आता पुढे ढकळून २१ डिसेंबर रोजी लागणार आहेत.
२० डिसेंबर रोजी निवडणुका संपल्यानंतर अर्धा तास एक्झिट पोल जाहीर करता येतील. २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिताही लागू राहील. ज्या ठिकाणी निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत, तिथे उमेदवारांना पूर्वी दिलेली निवडणूक चिन्हे अबाधित राहतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.






















