Times of Maharashtra Desk, Gauri Suicide Case: नुकत्याच झालेल्या डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी संतप्त प्रतीक्रिया पोस्ट केली आहे. नवऱ्यावर, सासूवर तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, त्याचप्रमाणे जिच्या सोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे आहे”, अशी मोठी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.
नक्की काय म्हणाल्या रूपाली पाटील ?
अशा घटना अत्यंत दुर्देवीच असतात. डॉक्टर गौरी यांच्या वडिलांचा आक्रोश पहिला. श्रीमंताला पोरी देवू नका असे म्हणत ओक्साबोक्सी रडत होते. एक बाप हतबल होता.””पण घरातील माणूस आत्महत्या केल्यावर हे कळण्यापेक्षा आधीच घरातील लोकांनी संवाद, साधने फार फार महत्त्वाचे आहे. मुळामध्ये मुलींना सक्षम बनून त्यांची मानसिक स्थिती ही माहेरचे किंवा सासरचे दोघांकडे एक समंजस पणाचं वागणे हे फार महत्त्वाचे आहे.
‘एक महिला घर उभं करू शकते आणि फोडूही शकते’; रूपाली ठोंबरे यांची अनैतिक संबंधावर कठोर टीका”
गौरी पालवे प्रकरणात नावऱ्यानचे बाहेर संबंध असल्यामुळे त्यांच्यात भांडण हयायची अशी बाब तपासात समोर आली आहे. या बद्दल भाष्य करत “डॉक्टर जरी असली तरी त्या सिच्युएशनला या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये नवऱ्याचे एक्स्ट्रा मॅरिटीयल अफेअर यावरून झालेले वाद हे फार महत्त्वाचे आहे. नवऱ्यावर, सासूवर तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे जिच्यासोबत एक्स्ट्रामॅरिटीयल अफेअर होतं, त्या महिलेला सुद्धा गुन्ह्यात आरोपी करणे गरजेचे आहे”, एक महिला एक घर उभ करू शकते तसंच ती एखाद घर फोडू सुद्धा शकते आशा बेकायदेशीर संबंध ठेवणाऱ्या महिलेवर देखील केस झाली पाहिजे. त्या शिवाय कुटुंब वाचणार नाहीत , कुटुंब सुरक्षित ठेवणीसाठी आशा महिलांवर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. अस झळ तर अनैतिक संबंध ठेवण्याचे धसाड कोणी करणार नाही असे रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हंटले आहे. पुढे त्यांनी असे देखील म्हंटले आहे की पत्नी तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत म्हणून आत्महत्या करते, तेव्हा नवऱ्यावर त्याच्या घरातील लोकांवर गुन्हा दाखल होतो पण खरी जी गुन्हेगार आहे. अनैतिक संबंध ठेवणारी महिला मोकाट राहता कामा नये. कितीही संकट, भांडण झाले तरी आत्महत्या पर्याय नाही. त्यामुळे आत्महत्या कोणीही करूच नये” असे आव्हान देखील रूपाली पाटील यांनी केले आहे.






















