Homeताज्या बातम्याNashik BJP Municipal Elections ; ‘सगळेच नेते व्हायचे, मग कार्यकर्ते कोण?’ –...

Nashik BJP Municipal Elections ; ‘सगळेच नेते व्हायचे, मग कार्यकर्ते कोण?’ – देवयानी फरांदे यांचा भावूक सवाल

Times of Maharashtra Desk: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपमध्ये आज माजी आमदार, माजी महापौरांसह पाच प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मात्र या पक्षप्रवेशावरून भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली.

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला अनुपस्थित राहून अप्रत्यक्ष विरोध दर्शवला होता. पक्षप्रवेशाच्या वेळी भाजप कार्यालयाबाहेर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना कार्यालयाबाहेरच घेराव घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “आज दिनकर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मनसे, काँग्रेस आणि उबाठा गटातील अनेक नेते मुख्य प्रवाहात आले आहेत. भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच त्यांनी प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील.”

वाटले ते बोलले. गेल्या 40 वर्षांत मी कधीही स्वतःसाठी भूमिका घेतली नाही. – आमदार देवयानी फरांदे

दरम्यान, आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिक्रिया देताना आपण नाराज नसल्याचे सांगितले, मात्र त्यांच्या डोळ्यांत अश्रू स्पष्टपणे दिसत होते. “मी कोणाचा विरोध केला नाही, फक्त माझे मत मांडले होते. आमदार म्हणून जे वाटले ते बोलले. गेल्या 40 वर्षांत मी कधीही स्वतःसाठी भूमिका घेतली नाही. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. सगळेच नेते बनू पाहतात, मग कार्यकर्ते कोण राहणार?” असे भावूक शब्द त्यांनी यावेळी उच्चारले.

हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे – संजय राऊत यांची टीका 
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही इतर पक्षांतील आमदार, खासदार आणि नेत्यांना कोणालाही न जुमानता पक्षात घेतले जात आहे. हे श्रीमंत भिकाऱ्याचे लक्षण आहे,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तर आता गिरीश महाजन आपली गँग तयार करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

नाशिकमधील या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात वाढलेली अस्वस्थता आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!