Homeताज्या बातम्याMunicipal Corporation Election BJP: उमेदवारी नाकारल्याने भाजप कार्यालयाबाहेर महिला इच्छूक उमेदवाराचा आत्मदहनाचा...

Municipal Corporation Election BJP: उमेदवारी नाकारल्याने भाजप कार्यालयाबाहेर महिला इच्छूक उमेदवाराचा आत्मदहनाचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरात राजकीय खळबळ

Times of Maharashtra Desk: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात तीव्र राजकीय घडामोडी घडल्या. भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या निषेधार्थ दिव्या उल्हास मराठे या इच्छूक महिला उमेदवाराने पक्षाच्या स्थानिक कार्यालयाबाहेर टोकाची भूमिका घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणतीही अनर्थकारी घटना टळली.

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाबाहेर एबी फॉर्मसाठी इच्छूक उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. याच दरम्यान काही इच्छूकांना उमेदवारी न मिळाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. प्रभाग क्रमांक २० मधील इच्छूक उमेदवार दिव्या मराठे आणि काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत तीव्र संताप व्यक्त केला.

या घटनेनंतर दिव्या मराठे यांनी स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप केले. “मी गेली १८ वर्षे पक्षासाठी काम केले आहे. पक्षासाठी अनेक अडचणी अंगावर घेतल्या. नगरसेवक असताना प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. सर्व्हेमध्ये नाव असूनही मागील वेळी आणि यावेळीही मला उमेदवारी नाकारण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, “पक्ष कठीण काळात असताना घरदार बाजूला ठेवून काम केले. आज पक्ष सत्तास्थानी असताना जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर संघर्ष करायचा आणि नेत्यांचे कुटुंबीय आरामात बसायचे, हे अन्यायकारक आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, भाजपमधील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे. काही इच्छूकांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकऱ्या सोडल्याचा दावाही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आल्याने असंतोष वाढल्याचे चित्र आहे. या प्रकरणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत शांतता राखली. घटनेबाबत पुढील तपास सुरू असून, राजकीय वर्तुळात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!