Times of Maharashtra Desk: निवडणुका दोन दिवसांवर आल्या आहेत . सर्वच पक्ष आपली ताकद लावत आहेत अशाच मी गेली ३० वर्षे कोंढव्यात वास्तव्यास आहे. कोंढव्यातल्या गल्ल्यांची ओळख मला शिकवावी लागणार नाही. कोंढव्याचा प्रत्येक कोपरा मला ओळखतो आणि माझं कामच त्याची साक्ष आहे, अशा शब्दांत काशीफ सय्यद यांनी भाजप नेते सतपाल यांनी केलेल्या वक्तव्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. सतपाल यांनी काशीफ सय्यद नवीन उमेदवार आहेत . त्यांना आम्ही प्रतिस्पर्धी मानत नाही . अशा प्रकारे सय्यदयांना टोला मारला होता .
ते पुढे म्हणाले, माझं काम बघायचं असेल तर कोंढव्याच्या गल्ल्या-गल्ल्यांत फिरा. मी केवळ राजकारणासाठी नव्हे तर कोंढव्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत आहे.
निवडणुकीनंतरच्या योजनांबाबत बोलताना काशीफ सय्यद यांनी मोठी घोषणा करत सांगितले की,
“निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ‘नशामुक्त कोंढवा’ घडवून आणण्याचा माझा संकल्प आहे.”
तसेच, “कोंढव्यातील प्रत्येक नागरिकाची समस्या ही माझीच समस्या आहे, या भावनेतून मी काम करतो. लोकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे खरे राजकारण आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रत्युत्तरामुळे कोंढव्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, आगामी निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.






















